शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:07 IST

नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देआयुक्तांच्या निर्णयावर महापौरांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.दुकानदार व कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत चाचणी करायाची आहे. त्यानंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास महापालिकेतर्फे कारवाई करीत दुकान बंद करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. नागपूर शहरात ५० हजार व्यापारी आहेत. त्यांच्याकडील कर्मचारी गृहित धरता ही संख्या पाच लाखांवर जाते. शहरात दररोज तीन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत १८ तारखेपर्यंत पाच लाख लोकांची चाचणी कशी करणार? यासाठी एका दिवशी ८० हजार तपासण्या कराव्या लागतील आणि यावर जवळपास ८० कोटी रुपये खर्च येईल. आजच्या परिस्थितीत हे शक्य नसल्याने आयुक्तांनी घेतलेला निर्णय तुघलकी व अव्यवहार्य असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.एनजीओची मदत घेणारकोरोना रुग्णांची वाढती संख्या व संसर्ग विचारात घेता मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील भार वाढला आहे. यंत्रणा कोलमडण्याकडे वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील एनजीओची मदत घेण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.व्यापाऱ्यांमध्ये संभ्रममनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुकानदार आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. व्यवसाय करून १८ ऑगस्टपर्यंत चाचणी कशी करायची, अशी चर्चा गुरुवारी व्यापाऱ्यांमध्ये होती.मनपाने झोननिहाय २२ चाचणी केंद्र सुरू केले आहेत. त्या ठिकाणी मोफत चाचणी होणार आहे. याशिवाय खासगी लॅबमध्ये अ‍ॅन्टिजन चाचणीसाठी ७०० रुपये खर्च येणार आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुकानात येणारे ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह आहेत वा नाही, याची माहिती दुकानदारांना नसते. पण स्वत:ला आणि कर्मचाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त राहतील. त्यामुळे व्यापाऱ्यांना निर्भीडपणे व्यवसाय करणे शक्य होणार आहे. ही दूरदूष्टी ठेवूनच मनपा आयुक्तांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. पुढे आदेश काढल्यानंतर अडचणी उद्भवू नये म्हणून दुकानदारांनी आताच स्वत:हून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केल्याचे अश्विन मेहाडिया यांनी सांगितले. १८ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांनी चाचणी केलेली नाही, असे आढळून आल्यास पुढे आयुक्त चाचणीचा कठोर आदेश काढू शकतात. तेव्हा व्यापाऱ्यांसाठी ही बाब अडचणीची ठरणार असल्याचे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, चेंबरच्या अध्यक्षांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना चाचणी करायची की व्यवसाय, हा प्रश्न उभा राहिला आहे. दुकानदारांना आदेश देऊन काहीही होणार नाही. त्यांना विश्वासात घेऊन आयुक्तांनी काम करावे. आपले आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंब कोरोनामुक्त ठेवण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्याची सूचना करावी, आदेश काढू नये. यासंदर्भात असोसिएशन आणि कॅट नागपूरचे पदाधिकारी मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या