शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:07 IST

नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देआयुक्तांच्या निर्णयावर महापौरांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.दुकानदार व कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत चाचणी करायाची आहे. त्यानंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास महापालिकेतर्फे कारवाई करीत दुकान बंद करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. नागपूर शहरात ५० हजार व्यापारी आहेत. त्यांच्याकडील कर्मचारी गृहित धरता ही संख्या पाच लाखांवर जाते. शहरात दररोज तीन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत १८ तारखेपर्यंत पाच लाख लोकांची चाचणी कशी करणार? यासाठी एका दिवशी ८० हजार तपासण्या कराव्या लागतील आणि यावर जवळपास ८० कोटी रुपये खर्च येईल. आजच्या परिस्थितीत हे शक्य नसल्याने आयुक्तांनी घेतलेला निर्णय तुघलकी व अव्यवहार्य असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.एनजीओची मदत घेणारकोरोना रुग्णांची वाढती संख्या व संसर्ग विचारात घेता मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील भार वाढला आहे. यंत्रणा कोलमडण्याकडे वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील एनजीओची मदत घेण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.व्यापाऱ्यांमध्ये संभ्रममनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुकानदार आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. व्यवसाय करून १८ ऑगस्टपर्यंत चाचणी कशी करायची, अशी चर्चा गुरुवारी व्यापाऱ्यांमध्ये होती.मनपाने झोननिहाय २२ चाचणी केंद्र सुरू केले आहेत. त्या ठिकाणी मोफत चाचणी होणार आहे. याशिवाय खासगी लॅबमध्ये अ‍ॅन्टिजन चाचणीसाठी ७०० रुपये खर्च येणार आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुकानात येणारे ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह आहेत वा नाही, याची माहिती दुकानदारांना नसते. पण स्वत:ला आणि कर्मचाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त राहतील. त्यामुळे व्यापाऱ्यांना निर्भीडपणे व्यवसाय करणे शक्य होणार आहे. ही दूरदूष्टी ठेवूनच मनपा आयुक्तांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. पुढे आदेश काढल्यानंतर अडचणी उद्भवू नये म्हणून दुकानदारांनी आताच स्वत:हून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केल्याचे अश्विन मेहाडिया यांनी सांगितले. १८ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांनी चाचणी केलेली नाही, असे आढळून आल्यास पुढे आयुक्त चाचणीचा कठोर आदेश काढू शकतात. तेव्हा व्यापाऱ्यांसाठी ही बाब अडचणीची ठरणार असल्याचे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, चेंबरच्या अध्यक्षांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना चाचणी करायची की व्यवसाय, हा प्रश्न उभा राहिला आहे. दुकानदारांना आदेश देऊन काहीही होणार नाही. त्यांना विश्वासात घेऊन आयुक्तांनी काम करावे. आपले आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंब कोरोनामुक्त ठेवण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्याची सूचना करावी, आदेश काढू नये. यासंदर्भात असोसिएशन आणि कॅट नागपूरचे पदाधिकारी मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या