शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी ७६ हजार मुलांना होतो क्षयरोग : डॉ.सुनील खापर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 20:01 IST

भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे उप-महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देलाखात ३७ बाल क्षयरोगींचा मृत्यू५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’

आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे उप-महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी येथे दिली.५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. खापर्डे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘जागतिक क्षयरोग अहवाल २०१६’ नुसार, क्षयरोग रु ग्णांमध्ये मोठी वाढ होत असून, भारतामध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये क्षयरोगाच्या रु ग्णांची संख्या २०१५ मध्ये १.७ दशलक्षवरून २.८ दशलक्षवर पोहोचली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षयरुग्णाला लवकर औषधोपचार मिळावा म्हणून केंद्र शासनाने ‘यूएटीबीसी’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यात शासकीय रुग्णालय, ‘डॉट सेंटर’ व आता खासगी डॉक्टरकडून क्षयरोगाचे निदान करून घेतल्यावर त्याला औषध दुकानातून मोफत औषधी देण्यात येत आहे. सोबतच सर्व प्रकारच्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी ‘जीन एक्सपर्ट’ (सीबीनॅट) उपकरण सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.‘एमडीआर’चे ४५ हजार रुग्णडॉ. खापर्डे म्हणाले, क्षयरोगाचे अनियमित औषधोपचार अथवा मध्येच औषधोपचार बंद केल्याने ‘ड्रग रेजिस्टंट’ म्हणजे औषधांना प्रतिसाद न देणारा ‘मल्टीड्रग्ज रेजिस्टंट’ (एमडीआर ) होऊ शकतो. भारतात सध्या या रुग्णांची संख्या ४५ हजार आहे, तर या औषधाचेही ‘रेजिस्टंट’ झालेल्या ‘एक्सडीआर’ रुग्णांची संख्या २-३ हजाराच्या घरात आहे. क्षयरोग कार्यक्रमात काम करणाºया डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांची सहा महिन्यातून एकदा तपासणी केली जात आहे. याशिवाय रुग्ण तपासणीच्या खोल्या हवेशीर ठेवण्याच्या, सर्वांसाठी मास्क उपलब्ध करून देण्याच्या व इतरही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.डॉ. खापर्डे म्हणाले, बालकांमध्ये क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण मोठे असण्याचे कारण म्हणजे लवकर निदान न होणे हा आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार न मिळणे. लवकर निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ‘सीबीनॅट’ उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोबतच पाण्यात विरघळणारी व मुलांच्या आवडीच्या चवीची औषधेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आहारासाठी लवकरच दरमहा विशिष्ट निधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.क्षयरोगाच्या रुग्णांना मिळणार दरमहा ५०० रुपयेडॉ. खापर्डे म्हणाले, क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे. क्षयरोगींना आवश्यक उपचारासोबतच त्यांचे योग्य पोषण व्हावे व रोग लवकर बरा व्हावा यासाठी शासनाच्यावतीने प्रत्येक क्षयरोगाच्या रुग्णाला आहार खर्च म्हणून दरमहा ५०० रुपये देण्याची योजना आहे. लवकरच याला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर