शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

कथेतून वाचकांना जागृत करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 19, 2014 00:46 IST

लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे.

समीक्षकांचा सूर : लोहिया अध्ययन केंद्रात तीन कथासंग्रहांचे प्रकाशन

नागपूर : लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे. या कथा वाचकांना झोप लागण्यासाठी नाही तर त्यांची झोप उघडण्यासाठी आहेत. विचार देणार्‍या या कथासंग्रहातून वाचकांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न तीनही लेखकांनी प्रभावीपणे केला असल्याचे मत प्रकाशन समारंभाला उपस्थित समीक्षकांनी व्यक्त केले. लोहिया अध्ययन केंद्राच्यावतीने आज तीन पुस्तकांचे प्रकाशन केंद्राच्या मधु लिमये सभागृहात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रभा मेहता यांच्या ‘कन्यावती भव’, अहफाज अहमद कुरेशी यांच्या ‘तमाचा’ आणि नरेन्द्र परिहार यांच्या ‘दौडो अनिस’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेन्द्र पटोरिया, डॉ. मिथिलेश अवस्थी, ओमप्रकाश शिव उपस्थित होते. उपाध्याय म्हणाले, कथालेखनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. कवितेपेक्षाही कथा लिहिणे अधिक कठीण आहे. कारण कथेत वाचकांना बांधून ठेवतानाच त्यांना विचार द्यावा लागतो किंवा विचारप्रवृत्त करावे लागते. परिहार यांच्या कथा बांधेसूद तर मेहता यांच्या कथा सूक्ष्म मनोवृत्तीचे दर्शन घडविणार्‍या आहेत. कुरेशी यांनी कथांमधून वाचकांना विचार करायला भाग पाडले, असे ते म्हणाले. पटोरिया म्हणाले, तीनही लेखकांच्या कथा अतिशय संवेदनशील आहेत. नीरक्षीर विवेक बुद्धीने या कथांची मांडणी करताना केवळ माणसांचे जगणे केंद्रस्थानी कथांमध्ये आहे. परिहार यांच्या कथा यथार्थ दर्शन घडविणार्‍या आहेत. मुंबईच्या मायानगरीत नायिका होण्यासाठी जाणार्‍या युवतींचे कसे शोषण होते, यावर त्यांनी अभ्यासपूर्ण कथा लिहिली आहे. अवस्थी म्हणाले, सर्वच लेखकांच्या कथा प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणार्‍या आणि अपेक्षा व्यक्त करणार्‍या आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांना भिडणार्‍या या कथा माणसांना जगण्याचा अर्थ सांगणार्‍या आहेत, असे ते म्हणाले. मेहता यांनी पुरुषी मानसिकतेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले पण त्यांना अपराध सिद्ध करता आला नाही. या लेखकांनी सातत्याने लिहित राहावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला केंद्राचे हरीश अड्याळकर, नाटककार अमर रामटेके, अग्रवाल आदी उपस्थित होते. संचालन नरेन्द्र परिहार यांनी केले. (प्रतिनिधी)