शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कथेतून वाचकांना जागृत करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 19, 2014 00:46 IST

लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे.

समीक्षकांचा सूर : लोहिया अध्ययन केंद्रात तीन कथासंग्रहांचे प्रकाशन

नागपूर : लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे. या कथा वाचकांना झोप लागण्यासाठी नाही तर त्यांची झोप उघडण्यासाठी आहेत. विचार देणार्‍या या कथासंग्रहातून वाचकांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न तीनही लेखकांनी प्रभावीपणे केला असल्याचे मत प्रकाशन समारंभाला उपस्थित समीक्षकांनी व्यक्त केले. लोहिया अध्ययन केंद्राच्यावतीने आज तीन पुस्तकांचे प्रकाशन केंद्राच्या मधु लिमये सभागृहात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रभा मेहता यांच्या ‘कन्यावती भव’, अहफाज अहमद कुरेशी यांच्या ‘तमाचा’ आणि नरेन्द्र परिहार यांच्या ‘दौडो अनिस’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेन्द्र पटोरिया, डॉ. मिथिलेश अवस्थी, ओमप्रकाश शिव उपस्थित होते. उपाध्याय म्हणाले, कथालेखनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. कवितेपेक्षाही कथा लिहिणे अधिक कठीण आहे. कारण कथेत वाचकांना बांधून ठेवतानाच त्यांना विचार द्यावा लागतो किंवा विचारप्रवृत्त करावे लागते. परिहार यांच्या कथा बांधेसूद तर मेहता यांच्या कथा सूक्ष्म मनोवृत्तीचे दर्शन घडविणार्‍या आहेत. कुरेशी यांनी कथांमधून वाचकांना विचार करायला भाग पाडले, असे ते म्हणाले. पटोरिया म्हणाले, तीनही लेखकांच्या कथा अतिशय संवेदनशील आहेत. नीरक्षीर विवेक बुद्धीने या कथांची मांडणी करताना केवळ माणसांचे जगणे केंद्रस्थानी कथांमध्ये आहे. परिहार यांच्या कथा यथार्थ दर्शन घडविणार्‍या आहेत. मुंबईच्या मायानगरीत नायिका होण्यासाठी जाणार्‍या युवतींचे कसे शोषण होते, यावर त्यांनी अभ्यासपूर्ण कथा लिहिली आहे. अवस्थी म्हणाले, सर्वच लेखकांच्या कथा प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणार्‍या आणि अपेक्षा व्यक्त करणार्‍या आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांना भिडणार्‍या या कथा माणसांना जगण्याचा अर्थ सांगणार्‍या आहेत, असे ते म्हणाले. मेहता यांनी पुरुषी मानसिकतेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले पण त्यांना अपराध सिद्ध करता आला नाही. या लेखकांनी सातत्याने लिहित राहावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला केंद्राचे हरीश अड्याळकर, नाटककार अमर रामटेके, अग्रवाल आदी उपस्थित होते. संचालन नरेन्द्र परिहार यांनी केले. (प्रतिनिधी)