शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कथेतून वाचकांना जागृत करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 19, 2014 00:46 IST

लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे.

समीक्षकांचा सूर : लोहिया अध्ययन केंद्रात तीन कथासंग्रहांचे प्रकाशन

नागपूर : लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे. या कथा वाचकांना झोप लागण्यासाठी नाही तर त्यांची झोप उघडण्यासाठी आहेत. विचार देणार्‍या या कथासंग्रहातून वाचकांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न तीनही लेखकांनी प्रभावीपणे केला असल्याचे मत प्रकाशन समारंभाला उपस्थित समीक्षकांनी व्यक्त केले. लोहिया अध्ययन केंद्राच्यावतीने आज तीन पुस्तकांचे प्रकाशन केंद्राच्या मधु लिमये सभागृहात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रभा मेहता यांच्या ‘कन्यावती भव’, अहफाज अहमद कुरेशी यांच्या ‘तमाचा’ आणि नरेन्द्र परिहार यांच्या ‘दौडो अनिस’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेन्द्र पटोरिया, डॉ. मिथिलेश अवस्थी, ओमप्रकाश शिव उपस्थित होते. उपाध्याय म्हणाले, कथालेखनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. कवितेपेक्षाही कथा लिहिणे अधिक कठीण आहे. कारण कथेत वाचकांना बांधून ठेवतानाच त्यांना विचार द्यावा लागतो किंवा विचारप्रवृत्त करावे लागते. परिहार यांच्या कथा बांधेसूद तर मेहता यांच्या कथा सूक्ष्म मनोवृत्तीचे दर्शन घडविणार्‍या आहेत. कुरेशी यांनी कथांमधून वाचकांना विचार करायला भाग पाडले, असे ते म्हणाले. पटोरिया म्हणाले, तीनही लेखकांच्या कथा अतिशय संवेदनशील आहेत. नीरक्षीर विवेक बुद्धीने या कथांची मांडणी करताना केवळ माणसांचे जगणे केंद्रस्थानी कथांमध्ये आहे. परिहार यांच्या कथा यथार्थ दर्शन घडविणार्‍या आहेत. मुंबईच्या मायानगरीत नायिका होण्यासाठी जाणार्‍या युवतींचे कसे शोषण होते, यावर त्यांनी अभ्यासपूर्ण कथा लिहिली आहे. अवस्थी म्हणाले, सर्वच लेखकांच्या कथा प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणार्‍या आणि अपेक्षा व्यक्त करणार्‍या आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांना भिडणार्‍या या कथा माणसांना जगण्याचा अर्थ सांगणार्‍या आहेत, असे ते म्हणाले. मेहता यांनी पुरुषी मानसिकतेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले पण त्यांना अपराध सिद्ध करता आला नाही. या लेखकांनी सातत्याने लिहित राहावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला केंद्राचे हरीश अड्याळकर, नाटककार अमर रामटेके, अग्रवाल आदी उपस्थित होते. संचालन नरेन्द्र परिहार यांनी केले. (प्रतिनिधी)