शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

न्यायपथावर चालणे हीच खरी पत्रकारिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 03:14 IST

कितीही दबाव आला आणि मृत्यू जरी समोर दिसत असला तरी अखेरपर्यंत न्यायाचीच भूमिका घेणारा खरा पत्रकार असतो.

कितीही दबाव आला आणि मृत्यू जरी समोर दिसत असला तरी अखेरपर्यंत न्यायाचीच भूमिका घेणारा खरा पत्रकार असतो. यामुळे प्रशासनासहित समाजालाही लाभ मिळतो. लोकशाहीचे तीन स्तंभ न्यायव्यवस्था, प्रशासन आणि शासन यांच्यावर दबाव आणणारा, प्रेरित करणारा, प्रसन्न करणारा, प्रशंसा करणारा लोकशाहीचा स्तंभ प्रेस आहे. त्यामुळे लोकशाहीत या तीनही स्तंभांना प्रभावित करणारा हा महत्त्वाचा स्तंभ आहे, असे मत कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वेदप्रताप वैदिक यांचा परिचय लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र यांनी करून दिला. प्रसारमाध्यमांचे काम बातमी देणे आहे. ही प्रक्रिया अखंड सुरू असते. लोकशाहीचे इतर तीन स्तंभ सुटी घेऊ शकतात, पण पत्रकारितेला अविश्रांत काम करणे आवश्यक आहे. सारे शरीर झोपले तरी हृदयाचे काम अखंड सुरू असते. त्याप्रमाणेच पत्रकारितेचे आहे. एक तासही बातम्यांचे चॅनेल, रेडिओ आणि वृत्तपत्रांचे काम बंद झाले तर समाजात अफवा पसरतील आणि सामाजिक सलोखा बिघडेल. त्यामुळेच हा स्तंभ सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कोट्यवधी लोक एकाच वेळी एखादी बातमी ऐकतात, पाहतात. लोकमतही लाखो लोक एकाच वेळी वाचतात. त्यामुळे माध्यमांच्या बातम्या ईश्वरवाणीसारख्या आहेत. सरकार आणण्याची आणि पाडण्याची शक्ती माध्यमांमध्ये आहे. त्यामुळेच पत्रकारिता निष्पक्ष आणि सत्याधारित असली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची पत्रकारिता अपरिपक्व आहे. केवळ वाद निर्माण करणे आणि निर्णयाप्रत न पोहोचण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत. त्यातुलनेत प्रिंट माध्यमे परिपक्व आहेत. पत्रकारिता हा साधा सौदा नाही. हा विचारांचा व्यवसाय आहे. यात अणुबॉम्बपेक्षा अधिक शक्ती आहे. एखादा अविचार विनाशकारीही असतो. त्यामुळे निकोप समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारातच मोठी शक्ती असते, असे ते म्हणाले.