शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:18 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही. विशेष म्हणजे ही योजना आदिवासी विभागाकडून राबविण्यात येते. पण शिष्यवृत्तीचे वितरण माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येते. या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने २०१६ -२०१७ व २०१७-१८ या वर्षातील शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.

ठळक मुद्देविभागांच्या असमन्वयात शिष्यवृत्ती रखडली : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही. विशेष म्हणजे ही योजना आदिवासी विभागाकडून राबविण्यात येते. पण शिष्यवृत्तीचे वितरण माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येते. या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने २०१६ -२०१७ व २०१७-१८ या वर्षातील शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.आदिवासी विभागातर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १ ते १० च्या विद्यार्थ्यांना १००० ते २००० रुपये दरम्यान शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज दाखल करायचे होते. विद्यार्थ्यांना अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडायचा होता. गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विभागाने शिष्यवृत्तीचे हे काम ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिले आहे. आदिवासी विभाग आलेल्या अर्जानुसार शिक्षण विभागाला निधी उपलब्ध करून देते. शिक्षण विभागाला तो निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचा आहे. पण २०१६-१७ व २०१७-१८ या दोन्ही वर्षाची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची ओरड शाळेकडून होत आहे. शाळांनी यासंदर्भात वेळोवेळी शिक्षण विभाग व आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयाकडेही पाठपुरावा केला. पण शिष्यवृत्तीचा गुंता काही सुटला नाही. त्यामुळे विद्यार्थी आजही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहे. तिकडे पालकांकडून शिक्षकांना शिष्यवृत्तीची विचारणा होत असल्याने शिक्षक ठोस कारण सांगण्यास हतबल ठरत आहे. त्यामुळे पालकांकडून शिक्षकांवरच संशय व्यक्त केला जात आहे.यासंदर्भात आदिवासी विभागाचे नागपूर प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या याद्या व निधी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा अहवालही मागितला आहे. परंतु त्यांच्याकडून अहवाल आलेला नाही.यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागातील शिष्यवृत्तीचे काम बघणाऱ्या अधिकाºयांना विचारणा केली असता, ते म्हणाले की २०१६-१७ चा निधी वाटप करण्यात आला आहे. २०१७-१८ च्या याद्या आल्या आहेत. आठवड्याभरात विद्यार्थ्यांचा खात्यात पैसे जमा होईल.शिष्यवृत्तीच्या बाबतीत दोन्ही विभागाकडून वेगवेगळे खुलासे आले असले तरी, २०१५-१६ पासूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी जोतोय कुठे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना