शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अनुसूचित जमातीत धनगरांना आरक्षण देण्याला आदिवासी संघटनांचा विरोध

By गणेश हुड | Updated: September 29, 2023 13:37 IST

संविधान चौकात साखळी उपोषण : आदिवासी संघटनांची वज्रमुठ 

नागपूर : ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करण्याच्या विरोधात ओबीसी संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने राज्यातील राजकारण पेटले आहे. त्यातआदिवासी समाजही आक्रमक झाला आहे. भटक्या संवर्गाच्या महाराष्ट्रातील ३.५ टक्के आरक्षणात गैरआदिवासी धनगरांना भटक्या संवर्गात आरक्षण देण्यावरून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. समविचारी संघटनांची वज्रमुठ बांधून संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

धनगरांना अनुसूचित जमातीत समावेश करून लाभ देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा शिंदे सरकारचा कट उधळून लावण्यासाठी आदिवासी संघटनांनी कंबर कसली आहे. विनोद मसराम यांनी सर्व मुळ व अग्रणी आदिवासी संघटनांशी  चर्चा करून सर्वांना एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गोंडवाना विकास मंडळ, गोंडवाना गणतंत्र पार्टी, ट्रायबल आफीसर्स फोरम, ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ, विदर्भ ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन, भाजपा आदिवासी आघाडी, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस यांच्यासह आरक्षणाच्या मुदयावर राज्यात प्रभावीपणे काम करणारी आदिवासींच्या न्यायिक अधिकारासाठी लढणारी अग्रणी संघटना अशी ओळख असणारी ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट) आदी संघटना आदिवासी आरक्षणाच्या प्रश्नावर एका व्यासपीठावर एकत्र आल्या आहेत.

कोणत्याही नवीन जातीचा समावेष अनुसूचित जमातीच्या यादीत करू नये अशी मागणी संयुक्त कृती समितीचे सिनेट सदस्य दिनेश शेराम, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे ,ऑफ्रोटचे अॅड. राजेंद्र मरसकोल्हे, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हाध्यक्ष गंगा टेकाम, ट्रायबल ऑफिसर्स फोरमचे एन झेड कुमरे, विदर्भ ट्रायबल डॉक्टर असोसिएशनचे डॉ. नरेंद्र कोडवते, आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भाचे मुकेश नेताम, भाजप आदिवासी आघाडीचे अरविंद गेडाम, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदीप मसराम, अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेचे विदर्भ युवा अध्यक्ष संतोष आतराम, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे मधुकर उईके, त्रीवेश कूमराल तोडूम यांच्यासह अन्य संघटनांच्या  प्रतिनिधींनी  केली आहे. 

सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास या साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशाराही संयुक्त आदिवासी कृती समितीचे विनोद मसराम यांनी दिला आहे.

टॅग्स :reservationआरक्षणnagpurनागपूर