शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आदिवासी मुलींनी राजकारणात यावे- निर्मला पुतुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:08 IST

आदिवासी मुलींनी राजकारणात यावे, त्यासाठी त्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे असे झारखंडच्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री निर्मला पुतुल यांचे स्पष्ट मत आहे.

ठळक मुद्देआदिवासी मुलांपेक्षा मुली अधिक संख्येने शिकत आहेतशिक्षणानेच स्वातंत्र्य व स्वावलंबन येईल

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आदिवासी मुलींनी राजकारणात यावे, त्यासाठी त्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे असे झारखंडच्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री निर्मला पुतुल यांचे स्पष्ट मत आहे. आदिवासी स्त्री स्वत:चे निर्णय स्वत: घेत असते. मात्र याचा अर्थ ती कामूक दृष्टीनेही स्वतंत्र असते, असा एक गैरसमज समाजात दृढ झालेला दिसतो. तो वृथा आहे. मात्र बरेचजण तसा अर्थ काढत असतात. आदिवासी स्त्री घरासाठी कष्ट करते, खरेदी करते. मात्र तिला संपत्तीत वाटा नसतो. तिला तिच्याच समाजात अधिकार नाहीत. ते तिला मिळायला हवेत. तिला आर्थिक स्वावलंबनापासून वंचित ठेवले जाते.नागपुरात आयोजित एका संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांचे आगमन झाले आहे.जोपर्यंत स्त्री शिक्षित होत नाही तोपर्यंत तिला स्वालंबनाची चव चाखता येणार नाही. हे स्वावलंबन शिक्षणाने येऊ शकते. आज आदिवासी पाड्यांवरच्या मुली मुलांच्या तुलनेत अधिक संख्येने शिक्षण घेत आहेत. त्या मेहनत करत आहेत. त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल अशी मला आशा वाटते. त्या दृष्टीने गावची मुखिया या नात्याने आमचे प्रयत्न सुरू आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.

कविता महाजन यांचे हृद्य स्मरणनिर्मला पुतुल यांचा ‘ नगाडे की तरह बजते शब्द’ या काव्यसंग्रहाचे इंग्रजी, मराठी, उर्दू, उडिया, कन्नड, पंजाबी, नेपाळी भाषेत भाषांतर झाले आहे. मराठीत हा अनुवाद दिवंगत ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांनी केला होता. कविता महाजन यांचे स्मरण करताना, निर्मला पुतुल यांनी, आमची भेट भोपाळमध्ये झाली होती. अचानक जुनी मैत्रीण भेटावी तशी ती भेट होती. त्या अतिशय सरळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने जी क्षती झाली आहे ती कदाचितच भरून निघू शकेल, असे उद्गार काढले.निर्मला पुतुल आहेत गावच्या ‘मुखिया’निर्मला पुतुल त्यांच्या गावच्या मुखिया म्हणून निवडून आल्या आहेत. गावातील मुलींच्या विकासात शिक्षणाचे महत्त्व त्यांना उमगत असल्याने त्यांनी त्यादृष्टीने गावात शिक्षणाची सोय केली आहे. त्या गावातील सर्व मुली शिक्षण घेत आहेत असं त्या साभिमान सांगतात.

 

टॅग्स :literatureसाहित्य