शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी विचारांतूनच आदिवासींचा विकास

By admin | Updated: April 17, 2016 03:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाप्रमाणे आदिवासींनाही विकासाचा मंत्र दिला आहे ...

एम्बस : ऊर्मिला मॉर्को यांचे प्रतिपादन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाप्रमाणे आदिवासींनाही विकासाचा मंत्र दिला आहे परंतु ते संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कास धरीत एकजूट होण्याची गरज आहे. आंबेडकरी विचारातूनच आदिवासींचा विकास शक्य आहे, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ऊर्मिला मॉर्को यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आॅल इंडिया मूलनिवासी बहुजन समाज सेंट्रल संघ (एम्बस)तर्फे कस्तुरचंद पार्कवर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एम्बसचे नॅशनल आॅर्गनायझर विजय मानकर होते. भदंत धम्मसारथी आणि बळवंत मेश्राम व्यासपीठावर होते. डॉ. मार्को म्हणाल्या,भारत स्वतंत्र होऊन ६५ वर्षे झाली आहेत. तरी दलित-आदिवासींवरील अन्याय दूर झालेला नाही. आजही दलित-आदिवासींवरच अन्याय का होतो. कारण आपण स्वत:ला असहाय समजतो. स्वत:ला असहाय समजू नका, एकजूट व्हा. आंबेडकरी विचरांची कास धरा. प्रत्येक घरात बाबासाहेब जन्माला यायला हवेत, असेही त्या म्हणाल्या. विजय मानकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल हा देशात राष्ट्रीय समता दिवस म्हणून आणि जगात मानवतावाद व प्रबुद्धवाद दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रियंका नेताम, साक्षी फुलझेले, अनन्या हिंगवे आदी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रा. राजेंद्र मोटघरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विकास नगराळे, डॉ. प्रदीप नगराळे, जयश्री शेवारे यांनी संचालन केले. काही नकली नक्षलवादीही तयार झाले. सध्या देशात काही नकली नक्षलवादीसुद्धा तयार झाले आहेत, असे डॉ. मॉर्को म्हणाले. (प्रतिनिधी)आज समारोप डॉ. आंबेडकर जयंतीचा १७ तारखेला समारोप कार्यक्रम होईल. यावेळी डॉ. मीरा नंदा (अमेरिका), दलित व्हाईसचे संपादक वी.टी. राजशेखर (कर्नाटक), अल्पेश ठाकूर प्रमुख अतिथी राहतील. यावेळी वी.टी. राजशेखर व मीरा नंदा यांना संयुक्तपणे वैश्विक मानव सेवेसाठी तर जीन ड्रीज यांना राष्ट्रीय सेवेसाठी १ लाख २५ हजार रुपयाचा पुरस्कार प्रदान केला जाईल.