शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

११ लाख उच्च रक्तदाब रुग्णांवर उपचार : डॉ. संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:13 IST

मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे३ लाख मधुमेह रुग्णांवर उपचाराचे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील जुलै २०१९ पर्यंत ५२,०१८ उच्च रक्तदाबाच्या तर ४०६४ मधुमेह रुग्णांना नियमित औषधोपचार पुरविले जात आहेत. ही योजना २५४ प्राथमिक आरोग्य केंद्र व ६७ नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधून उपचार केले जातील. मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.संशोधनानुसार ३० वर्षांवरील व्यक्तीपैकी ७ टक्के नागरिक मधुमेह तर २५ टक्के लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत; शिवाय गुणवत्तापूर्ण औषधांच्या अभावामुळे ९० टक्केरुग्णांचा औषधोपचार खंडित होतो. या अभियानांतर्गत जागतिक आरोग्य संघटना व राज्य शासनाद्वारे निर्धारित उपचार पद्धतीने रुग्णांना औषधी उपलब्ध करून दिल्या जातील. उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रणाद्वारे हृदयविकार, पक्षाघात, मूत्रपिंडाचे विकार आणि रेटिनोपॅथी यासारख्या आजारांवर ५० टक्के नियंत्रण मिळविणे अपेक्षित आहे.शोधमोहिमेदरम्यान आरोग्य विभागातील एएनएम व आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन प्रौढ व्यक्तींचे रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करतील. संशयित रुग्णांची प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे तपासणी करून ३० दिवसांचे औषध दरमहा पुरविण्यात येईल. विभागातील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रासह आरोग्य उपकेंद्रातून तपासणी केली जाईल. येत्या दीडवर्षात एकूण ४३.४३ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे संजीव कु मार यांनी सांगितले.वर्धा व भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबविण्यात आली होती. योजनांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन उच्चरक्तदाब व मधुमेह नियंत्रणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत उच्च रक्तदाबाचे ५२ हजार तर मधुमेहाचे ४,०६४ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.आरोग्य उपकेंद्रात बीएएमएस डॉक्टरउच्च रक्तदाब व मधुमेही रुग्ण शोधमोहिमेला गती मिळावी व मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी विभागातील सर्व आरोग्य उपकेंद्रात बीएएमएस डॉक्टर उपलब्ध करणार असल्याची माहिती संजीव कुमार यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यMediaमाध्यमे