शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

सर्वधर्मसमभावासाठी त्याचे सायकलवर भारतभ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:05 IST

वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.

ठळक मुद्देआठ राज्य फिरून नागपूरला आगमन : कर्नाटकच्या ज्येष्ठाची दीड वर्षापासून यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.नागराज हे मूळचे कर्नाटकमधील हासन येथील रहिवासी. बालपणापासून बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड आवड. तरुणपणी मनात विचार आला आणि घरदार सोडून त्यांनी मुंबई गाठली. चित्रपटात मात्र काम मिळाले नाही. एक दिवस कुणाच्या तरी ओळखीने चित्रपटांच्या शुटींगच्या वेळी गर्दी दिसावी म्हणून त्यांना काम मिळाले. त्यासाठी मोबदलाही मिळाला. पुढे त्यांनी हेच काम स्वीकारले. चित्रपटात काम मिळाले नाही पण गर्दीचा भाग म्हणून स्थान मिळाले. गर्दीत उभे राहायचे व काम नसले की चित्रपट बघायचे हाच त्यांचा नित्यक्रम. नागराज थोडे धार्मिक प्रवृत्तीचे. त्यामुळे धार्मिक, सामाजिक संदेश असलेले आणि देशभक्तिपर चित्रपट त्यांच्या आवडीचे. पाहता पाहता अनेक वर्षे उलटली. लग्न झाले नाही व मुंबईत एकट्याचेच बस्तान.एक दिवस सायकलवर भारत भ्रमण करण्याचा विचार मनात आला आणि डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईवरून ही स्वारी सायकलवर निघाली. सनातन धर्माच्या आधारावर देशात सर्वधर्मसमभाव नांदावा, मानवता रहावी, गोरक्षा, देशभक्ती, विश्वशांती तसेच पाणी वाचवा-वृक्ष जगवा हा संदेश देत ते गुजरातकडे रवाना झाले. पुढे राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड होत दिल्ली गाठली. या प्रवासात अनेक राजकीय नेत्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उत्तरप्रदेश व मध्य प्रदेश प्रवास करीत ते गुरुवारी नागपूरला पोहचले. यादरम्यान त्यांनी विविध राज्यांच्या वेगवेगळ्या शहरात मुक्काम ठोकला. नुकताच अलाहाबादला कुंभमेळा सुरू असताना २० दिवस या शहरात थांबल्याचे त्यांनी सांगितले. जेवणाची फिकीर नाही. कधी मठात, कधी मंदिरात तर कधी गुरुद्वारामध्ये जेवण केल्याचे त्यांनी सांगितले.दररोज ८० ते ९० किमीचा सायकलवर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा. मिळालेल्या लोकांना आपला संदेश सांगायचा आणि पुढच्या प्रवासाला लागायचे. असे करीत दीड वर्षापासून त्यांची भटकंती सुरू आहे. यापुढे महाराष्ट्रातील शहरे फिरून ते कर्नाटकला रवाना होतील. पावसाळा आपल्या गावी काढून पुन्हा दक्षिण भारताच्या प्रवासाला निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतCyclingसायकलिंग