शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

सर्वधर्मसमभावासाठी त्याचे सायकलवर भारतभ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:05 IST

वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.

ठळक मुद्देआठ राज्य फिरून नागपूरला आगमन : कर्नाटकच्या ज्येष्ठाची दीड वर्षापासून यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.नागराज हे मूळचे कर्नाटकमधील हासन येथील रहिवासी. बालपणापासून बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड आवड. तरुणपणी मनात विचार आला आणि घरदार सोडून त्यांनी मुंबई गाठली. चित्रपटात मात्र काम मिळाले नाही. एक दिवस कुणाच्या तरी ओळखीने चित्रपटांच्या शुटींगच्या वेळी गर्दी दिसावी म्हणून त्यांना काम मिळाले. त्यासाठी मोबदलाही मिळाला. पुढे त्यांनी हेच काम स्वीकारले. चित्रपटात काम मिळाले नाही पण गर्दीचा भाग म्हणून स्थान मिळाले. गर्दीत उभे राहायचे व काम नसले की चित्रपट बघायचे हाच त्यांचा नित्यक्रम. नागराज थोडे धार्मिक प्रवृत्तीचे. त्यामुळे धार्मिक, सामाजिक संदेश असलेले आणि देशभक्तिपर चित्रपट त्यांच्या आवडीचे. पाहता पाहता अनेक वर्षे उलटली. लग्न झाले नाही व मुंबईत एकट्याचेच बस्तान.एक दिवस सायकलवर भारत भ्रमण करण्याचा विचार मनात आला आणि डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईवरून ही स्वारी सायकलवर निघाली. सनातन धर्माच्या आधारावर देशात सर्वधर्मसमभाव नांदावा, मानवता रहावी, गोरक्षा, देशभक्ती, विश्वशांती तसेच पाणी वाचवा-वृक्ष जगवा हा संदेश देत ते गुजरातकडे रवाना झाले. पुढे राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड होत दिल्ली गाठली. या प्रवासात अनेक राजकीय नेत्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उत्तरप्रदेश व मध्य प्रदेश प्रवास करीत ते गुरुवारी नागपूरला पोहचले. यादरम्यान त्यांनी विविध राज्यांच्या वेगवेगळ्या शहरात मुक्काम ठोकला. नुकताच अलाहाबादला कुंभमेळा सुरू असताना २० दिवस या शहरात थांबल्याचे त्यांनी सांगितले. जेवणाची फिकीर नाही. कधी मठात, कधी मंदिरात तर कधी गुरुद्वारामध्ये जेवण केल्याचे त्यांनी सांगितले.दररोज ८० ते ९० किमीचा सायकलवर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा. मिळालेल्या लोकांना आपला संदेश सांगायचा आणि पुढच्या प्रवासाला लागायचे. असे करीत दीड वर्षापासून त्यांची भटकंती सुरू आहे. यापुढे महाराष्ट्रातील शहरे फिरून ते कर्नाटकला रवाना होतील. पावसाळा आपल्या गावी काढून पुन्हा दक्षिण भारताच्या प्रवासाला निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतCyclingसायकलिंग