शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

coronavirus; ट्रॅव्हल एजंटांचे दरमहा १०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:00 IST

कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

ठळक मुद्देउपराजधानीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकीट विक्री थंडकॅन्सलेशन चार्जेसचाही फटका

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकिटे विकली जात नाहीत शिवाय विमान, बस व रेल्वे तिकिटांचे कॅन्सलेशन चार्जेस कापून घेतले जात असल्याचे हे नुकसान होत आहे. विमान तिकिटांसाठी देशांतर्गत कॅन्सलेशन चार्ज २५०० ते ३००० आहे तर आंतरराष्ट्रीय तिकीटांसाठी ७००० ते ३०,००० आहे, असेही अग्रवाल म्हणाले.नागपूरात जवळपास ५०० ट्रॅव्हल एजंट्स काम करतात. त्यात बस, रेल्वे, विमानाची तिकिटे बुक करणे हॉटेल, वाहनांचे आरक्षण, यात्रा व देशी/विदेशी टूर आयोजित करणे, जंगल सफारी यांचा समावेश असतो. नागपुरातून दररोज ५००० प्रवासी विमानाने बाहेर जातात/येतात तर बस आणि रेल्वे प्रवाशांची संख्या जवळपास १.५० लाख आहे. सध्या विमान प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे, असे अनेक ट्रॅव्हल एजंटनी सांगितले.मध्य भारतातील सर्वात मोठी ट्रॅव्हल एजन्सी पवनसुत ट्रॅव्हल्स प्रा. लि. मधून रोज १४० ते १५० देशांतर्गत तिकिटे तर १५ ते २० आंतरराष्ट्रीय तिकिटे बुक होतात. सध्या फक्त ३० ते ३५ देशांतर्गत तिकिटे बुक होतात व एकही आंतरराष्ट्रीय तिकीट विकले जात नाही, असे सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जॅगसन्स ट्रॅव्हल्सचे प्रबंध संचालक हरमनदीपसिंग आनंद म्हणाले, व्यवसाय मंदावल्यामुळे आम्ही ४० पैकी ३५ कर्मचाऱ्यांना घरात बसून काम करायला सांगितले आहे.निखार ट्रॅव्हल्सचे सुधीर पारख म्हणाले की केरळ, गोवा, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश यांनी देशांतर्गत प्रवाशांना प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवसाय ४० ते ५० टक्के घटला आहे. आंतरराष्ट्रीय बुकिंग ८० ते ९० टक्क्यांनी घटले आहे.डेस्टिनेशन ट्रॅव्हल्स व व्हॅकेशन प्लॅनर्सचे राज अकोलकर व अंकुश ट्रॅव्हल्सचे अंकुश देशमुख यांनी विमान तिकिटे रद्द झाली तर हॉटेल व वाहनांचे बुकिंगही रद्द करावे लागते, त्यामुळे तिहेरी नुकसान होते असे सांगितले.अद्वैत ट्रॅव्हल्सचे विजय कृपाल यांनी कोरोनाच्या भीतीने बस व रेल्वेने प्रवास करणे टाळत आहेत त्यामुळे व्यवसाय ५० टक्के घटला आहे, असे सांगितले.एप्रिल व मे हे दोन महिने देशांतर्गत व विदेशी टूरसाठी महत्त्वाचे असतात; पण यावर्षी दोन्ही महिन्यातील टूर रद्द झाले आहेत, हे मोठे नुकसान आहे. व्यवसाय किमान दोन ते तीन महिने पूर्वपदावर येणार नाही, असे सर्वच ट्रॅव्हल एजंटांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस