शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वाहतूकदारांचा संप मिटला : केंद्र शासनासोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:20 IST

केंद्र शासनाने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेला वाहतूकदारांचा संप शुक्रवारी मिटला. पण देशात ट्रक वाहतूक सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे मत नागपूर ट्रकर्स यूनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देवाहतूक सुरळीत होण्यास लागणार आठवडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेला वाहतूकदारांचा संप शुक्रवारी मिटला. पण देशात ट्रक वाहतूक सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे मत नागपूर ट्रकर्स यूनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.संप मिटल्यानंतर रस्त्यावर आठ दिवसांपासून उभे असलेले ट्रक रात्री ९ वाजेपासून रस्त्यावर धावत आहेत. काही मागण्यांवर सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे नागपुरातील सर्व वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संपामुळे गोदाम आणि बुकिंग कार्यालयाचे कामकाज संचालित होण्यास आठवडा लागणार आहे. संप मिटल्याची सूचना सर्व वाहतूकदारांना देण्यात आली आहे. संपादरम्यान नागपुरातील जवळपास १८ ते २० हजार ट्रक रस्त्यांवर उभे होते. शिवाय अन्य राज्यातून आलेले ट्रक चालकांनी रस्त्याच्या कडेला उभे केले होते.संपादरम्यान डिझेल विक्री ८० टक्के कमी झाली. शिवाय टोल नाके आणि धाबा मालकांना फटका बसला. संपामुळे ट्रक मालक आणि वाहतूकदारांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरून निघण्यास वर्ष लागणार आहे. सरकारने पूर्वीच चर्चा करून संप मिटविला असता तर हे नुकसान झाले नसते. पण सरकारच्या सकारात्मक धोरणामुळे वाहतूकदार आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे मारवाह म्हणाले.

 

 

 

टॅग्स :Strikeसंपnagpurनागपूर