शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

तीन हजार भरल्यावरच सुरू होणार बंद ‘ट्रान्सफार्मर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:46 IST

राज्यातील ४२ लाख कृषी पंप जोडणी घेणाऱ्या ग्राहकांकडे २५ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने ही बाब गंभीरतेने घेतली असून, कृषी पंप जोडण्यांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जोडण्या कापल्या जाणार आहेत. अशास्थितीत जुळलेले सर्व ग्राहक जेव्हा तीन हजार रुपये भरतील तेव्हाच बंद ‘ट्रान्सफार्मर’ सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोषी शेतकऱ्यांविरोधात ‘महावितरण’ची कडक भूमिका : अवैध कृषी पंप जोडण्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील ४२ लाख कृषी पंप जोडणी घेणाऱ्या ग्राहकांकडे २५ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने ही बाब गंभीरतेने घेतली असून, कृषी पंप जोडण्यांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जोडण्या कापल्या जाणार आहेत. अशास्थितीत जुळलेले सर्व ग्राहक जेव्हा तीन हजार रुपये भरतील तेव्हाच बंद ‘ट्रान्सफार्मर’ सुरू करण्यात येणार आहे.मागील काही महिन्यांपासून कृषी ‘फीडर्स’वर विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाली आहे. कृषी ‘फीडर्स’च्या ‘लाईन’वर अनधिकृत जोडण्यांमुळे वीज पुरवठा प्रभावित होत आहे. यामुळे भार वाढत असून ‘ट्रान्सफार्मर्स’ जळत आहेत. सोबतच ‘कंडक्टर्स’देखील तुटत असून शेतकऱ्यांचे मोटरपंप खराब होत आहे.तक्रारी वाढल्यानंतर प्राथमिक तपासणीत अनेक शेतकऱ्यांनी अनधिकृत जोडण्या घेतल्याचे आढळून आले. या समस्येपासून सुटका मिळावी यासाठी ‘महावितरण’ने अवैध कृषी पंप जोडण्यांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. चार ते सहा आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या मोहिमेंतर्गत अवैध जोडणीसाठी उपयोगात आणलेल्या सर्व वस्तूंना जप्त करण्यात येईल व आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.त्याचप्रमाणे ‘महावितरण’ने थकीत देयके वसूल करण्यासाठीदेखील विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर एखादा ‘ट्रान्सफार्मर’ बिघडला तर त्याच्याशी जुळलेल्या सर्व ग्राहकांना तीन हजार रुपये भरावे लागतील, तरच त्याला सुरू करण्यात येईल. ज्या ग्राहकांकडे ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच ही सुविधा प्राप्त होईल. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील अशीच मोहीम राबविण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर त्यातील अटी शिथिल करण्यात आल्या होत्या.कारवाईचा अहवाल द्यावा लागणार‘महावितरण’च्या या मोहिमेत सर्व भरारी पथकांचा उपयोग करण्यात येईल. हलगर्जीपणा दाखविणाºया अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल. मुख्य अभियंत्यांना प्रत्येक आठवड्यात कारवाईचा अहवाल सादर करावा लागेल. राज्याच्या प्रत्येक उपविभागीय व विभागीय कार्यालयांना ही मोहीम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीmahavitaranमहावितरण