शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

तीन हजार भरल्यावरच सुरू होणार बंद ‘ट्रान्सफार्मर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:46 IST

राज्यातील ४२ लाख कृषी पंप जोडणी घेणाऱ्या ग्राहकांकडे २५ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने ही बाब गंभीरतेने घेतली असून, कृषी पंप जोडण्यांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जोडण्या कापल्या जाणार आहेत. अशास्थितीत जुळलेले सर्व ग्राहक जेव्हा तीन हजार रुपये भरतील तेव्हाच बंद ‘ट्रान्सफार्मर’ सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोषी शेतकऱ्यांविरोधात ‘महावितरण’ची कडक भूमिका : अवैध कृषी पंप जोडण्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील ४२ लाख कृषी पंप जोडणी घेणाऱ्या ग्राहकांकडे २५ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने ही बाब गंभीरतेने घेतली असून, कृषी पंप जोडण्यांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जोडण्या कापल्या जाणार आहेत. अशास्थितीत जुळलेले सर्व ग्राहक जेव्हा तीन हजार रुपये भरतील तेव्हाच बंद ‘ट्रान्सफार्मर’ सुरू करण्यात येणार आहे.मागील काही महिन्यांपासून कृषी ‘फीडर्स’वर विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाली आहे. कृषी ‘फीडर्स’च्या ‘लाईन’वर अनधिकृत जोडण्यांमुळे वीज पुरवठा प्रभावित होत आहे. यामुळे भार वाढत असून ‘ट्रान्सफार्मर्स’ जळत आहेत. सोबतच ‘कंडक्टर्स’देखील तुटत असून शेतकऱ्यांचे मोटरपंप खराब होत आहे.तक्रारी वाढल्यानंतर प्राथमिक तपासणीत अनेक शेतकऱ्यांनी अनधिकृत जोडण्या घेतल्याचे आढळून आले. या समस्येपासून सुटका मिळावी यासाठी ‘महावितरण’ने अवैध कृषी पंप जोडण्यांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. चार ते सहा आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या मोहिमेंतर्गत अवैध जोडणीसाठी उपयोगात आणलेल्या सर्व वस्तूंना जप्त करण्यात येईल व आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.त्याचप्रमाणे ‘महावितरण’ने थकीत देयके वसूल करण्यासाठीदेखील विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर एखादा ‘ट्रान्सफार्मर’ बिघडला तर त्याच्याशी जुळलेल्या सर्व ग्राहकांना तीन हजार रुपये भरावे लागतील, तरच त्याला सुरू करण्यात येईल. ज्या ग्राहकांकडे ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच ही सुविधा प्राप्त होईल. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील अशीच मोहीम राबविण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर त्यातील अटी शिथिल करण्यात आल्या होत्या.कारवाईचा अहवाल द्यावा लागणार‘महावितरण’च्या या मोहिमेत सर्व भरारी पथकांचा उपयोग करण्यात येईल. हलगर्जीपणा दाखविणाºया अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल. मुख्य अभियंत्यांना प्रत्येक आठवड्यात कारवाईचा अहवाल सादर करावा लागेल. राज्याच्या प्रत्येक उपविभागीय व विभागीय कार्यालयांना ही मोहीम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीmahavitaranमहावितरण