शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

पाच महिन्यांत १३० किलोमीटर वेगाने धावणार रेल्वे गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नागपूर : इटारसी-बल्लारशाह सेक्शनची क्षमता वाढविण्यात येत आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांची परवानगी मिळताच या सेक्शनमध्ये आगामी पाच ...

नागपूर : इटारसी-बल्लारशाह सेक्शनची क्षमता वाढविण्यात येत आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांची परवानगी मिळताच या सेक्शनमध्ये आगामी पाच महिन्यांत रेल्वे गाड्या प्रतितास १३० किलोमीटर वेगाने चालविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी नागपूर विभागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले, इटारसी-बल्लारशाह सेक्शनमध्ये १३० किलोमीटर वेगाने रेल्वे गाड्या चालविण्यासाठी चाचणी सुरू आहे. त्यानंतर नागपूर-वर्धा, नागपूर-बल्लारशाह सेक्शनमध्येही चाचणी घेण्यात येणार आहे. आरडीएसओच्या (रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) वतीने चाचणी घेण्यात येत आहे. आरडीएसओ आपला अहवाल देईल. अहवालात काही सुधारणा सुचविल्यास संबंधित कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी यांना इटारसी ते बल्लारशाह ट्रायल घेण्यासाठी अर्ज करण्यात येईल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास इटारसी-बल्लारशाह सेक्शनमध्ये पाच महिन्यांत रेल्वे गाड्या १३० किलोमीटर वेगाने धावू शकतील, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सुविधेसाठी समर्पित भावनेने कार्य केले. विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालवून १.१४ लाख टन औषधांसह जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. ६०० श्रमिक स्पेशल गाड्या चालवून श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आले. लॉकडाऊनमध्ये ६८ किलोमीटर रेल्वे रुळाचे दुहेरीकरण करण्यात आले. २७५ किलोमीटर रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात मालगाड्यांचा वेग २४ किलोमीटरवरून ४२ किलोमीटर प्रतितास करण्यात आला. रेल्वेस्थानकावर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. बल्लारशाह, चंद्रपूर, माजरी, वरोरा येथील स्थानकांची पाहणी केली असता तेथील कर्मचारी चांगले काम करीत आहेत. नागपूर विभागात प्रवाशांना तसेच दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

..........

थर्ड, फोर्थ लाइनचे काम प्रगतिपथावर

नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती महाव्यवस्थापकांंनी दिली. सिंधी ते बुटीबोरीदरम्यान २० किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे. उर्वरित कामासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

..........