शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विभागात १३० किलोमीटर वेगाने धावणार रेल्वेगाड्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर विभागात प्रति तास १३० किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी काही कामे करावयाची आहेत. विभागाला ...

नागपूर : नागपूर विभागात प्रति तास १३० किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी काही कामे करावयाची आहेत. विभागाला असलेल्या गरजांबाबत झोन मुख्यालयाला सूचना देण्यात आली आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ रिचा खरे यांनी केले. हे काम पूर्ण झाल्यानंतर आरडीएसओ प्रति तास १३० किलोमीटरच्या वेगाने ट्रायल घेणार असून काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘डीआरएम’ रिचा खरे म्हणाल्या, वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशनच्या प्रोजेक्टसाठी मध्य रेल्वे आणि आयआरएसडीसीकडून कराराची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेगाड्यात बेड रोलचा पुरवठा बंद असल्यामुळे अजनीतील मॅकेनाईज्ड लॉंड्रीमध्ये काम सुरू झालेले नाही. या लॉंड्रीचा दुसऱ्या पद्धतीने वापर करण्याबाबत रेल्वे बोर्डाशी बोलणे सुरू आहे. बोर्डाने याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. निधीचा तुटवडा असल्यामुळे प्रवासी सुविधांशी संबंधित विकासकामे प्रभावित होत आहेत. परंतु रेल्वे परिचालनाच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षेशी संबंधित कामे थांबविण्यात आलेली नाहीत. गड्डीगोदाम रेल्वे पुलावर सुरू असलेले देखभालीचे काम मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत चालणार आहे. तर रेल्वे गार्डसह इतर रनिंग स्टाफला सॅनिटायझर किट देण्यात आली आहे. तसेच लॉबीतही सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत ब्रेकव्हॅनमध्ये गार्डला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाही. आपल्या कार्यकाळात रेल्वे सुरक्षा, डिजिटलायझेशन, प्रवासी सुविधा आणि उत्पन्न वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप कुमार सतपथी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील, जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव उपस्थित होते.

............

रेल्वेने पाठविला ६ हजार टन संत्रा

‘डीआरएम’ खरे म्हणाल्या, कोरोनाच्या काळात विभागाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले. आता संत्रा, कापूस, फ्लायअ‍ॅश, ट्रॅक्टर्स रेल्वेने वाहतूक करण्यात येत आहे. आतापर्यंत विभागाने २३ मालगाड्यांच्या माध्यमातून ६ हजार टन संत्रा दिल्ली आणि शालीमारला पाठविला. डिसेंबर अखेरपर्यंत विभागाने २ हजार कोटी उत्पन्न मिळविले आहे. कोरोनामुळे हे उत्पन्न उद्देशापेक्षा ६०० कोटी रुपये कमी आहे. विभागाने १६ श्रमिक स्पेशल गाड्या चालवून ९ लाख प्रवाशांना पाठविले आहे. मालगाड्यांचा वेग २१ किलोमीटरवरून ४० किलोमीटर वाढविण्यात आला आहे.

अजनी वन वाचविणे महामेट्रो, एनएचएआयची जबाबदारी

‘डीआरएम’ रिचा खरे यांनी सांगितले की, अजनीत प्रस्तावित इंटरमॉडेल रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केवळ आपली जमीन दिली आहे. या प्रकल्पाला साकारताना अजनी रेल्वे परिसरातील वृक्षांना वाचविण्याची जबाबदारी महामेट्रो आणि एनएचएआयची आहे. त्यांच्यातच या प्रकल्पाबाबत करार झाला आहे. तेच याबाबत योग्य पाऊल उचलणार आहेत. मध्य रेल्वेने या प्रकल्पासाठी अजनीतील ४४ हेक्टर जमीन दिल्याचे त्यांनी सांगितले.

..........