शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

दक्षिणेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या फोडत आहेत प्रवाशांना घाम; तीन-तीन तास विलंब 

By नरेश डोंगरे | Updated: June 3, 2023 21:26 IST

बंगळुरू, म्हैसूर, चेन्नईकडून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने नागपूर स्थानकावर पोहचत आहेत.

नागपूर : दक्षिणेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या प्रवाशांना अक्षरश: घाम फोडत आहेत. गर्मी आणि उकाड्यात नागपूर रेल्वे स्थानकावर तास-न-तास या गाड्यांची प्रतिक्षा करावी लागत असल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले आहेत.

बंगळुरू, म्हैसूर, चेन्नईकडून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने नागपूर स्थानकावर पोहचत आहेत. या गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांची रेल्वेस्थानकावर सारखी गर्दी वाढत आहे. शनिवारी हजारो प्रवासी उकाड्याचा त्रास सहन करत रेल्वेगाडीची वाट बघत होते. आता येईल मग येईल, असे करता करता म्हैसूर दरभंगा एक्सप्रेस तब्बल तीन तास उशिराने नागपूर स्थानकावर पोहचली. 

एर्नाकुलम-बरौनी राप्तीसागर एक्सप्रेसही तीन तास विलंबाने आली. चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेस दोन तास, विशाखापट्टनम - नवी दिल्ली एपी एक्सप्रेस दोन तास, बंगळुरू निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस एक तास, तर यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेस दोन तास विलंबाने नागपूरात पोहचली. 

यामुळे या गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांचा अक्षरश: घाम निघाला. दरम्यान, दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या एवढ्या विलंबाने का धावत आहेत, त्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

टॅग्स :railwayरेल्वे