शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

नागपूरचे वाहतूक पोलीस हायकोर्टाच्या नजरेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:39 IST

वाहतूक पोलिसांनी त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याचा निर्णय घेऊन, यासंदर्भात बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे वाहतूक पोलीस सतत हायकोर्टाच्या नजरेखाली राहणार आहेत. यापुढे वाहतूक पोलिसांनी कर्तव्यात हयगय करणे खपणार नाही.

ठळक मुद्देजनहित याचिका दाखल : कर्तव्यात हयगय करणे खपणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक पोलिसांनी त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याचा निर्णय घेऊन, यासंदर्भात बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे वाहतूक पोलीस सतत हायकोर्टाच्या नजरेखाली राहणार आहेत. यापुढे वाहतूक पोलिसांनी कर्तव्यात हयगय करणे खपणार नाही.उच्च न्यायालयात अवैध पार्किंग, वाहतूक कोंडी, वाहतूक नियमांचे उल्लंघन इत्यादी मुद्यांवरील जनहित याचिका प्रलंबित आहेत. या प्रकरणात १२ डिसेंबर २०१८ रोजी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी वाहतूक पोलिसांविषयी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. शहरातील चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कुणी वाहतूक नियम तोडताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. असे असले तरी वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. परंतु, बरेचदा वाहतूक पोलीस रोडच्या बाजूने मोबाईल पाहताना दिसून येतात. वाहन चालक त्याचा फायदा घेऊन वाहतूक नियम तोडतात. त्यामुळे यानंतर वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियोजन करणे सोडून रोडच्या बाजूला मोबाईल पाहताना दिसायला नकोत, असे न्यायालय म्हणाले होते. तसेच, यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला होता. त्यानंतर कर्तव्यात कुचराई केल्यामुळे ११ वाहतूक पोलिसांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ही माहिती बुधवारी न्यायालयाला देण्यात आली. परंतु, न्यायालयाने हा विषय एवढ्यावरच सोडून दिला नाही. वाहतूक पोलिसांनी नेहमीच आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावावे, यासाठी जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.२० हजारावर वाहन चालकांवर कारवाईविभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून १० जानेवारी रोजी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची माहिती दिली. त्यानुसार, ट्रॅफिक सिग्नल तोडल्यामुळे गेल्यावर्षी २० हजार ७९६ तर, यावर्षी ८ जानेवारीपर्यंत ६१० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे २०१७ मध्ये २० हजार ५६६ तर, २०१८ मध्ये ४२ हजार ७६१ प्रकरणांची नोंद करण्यात आली. दारु पिऊन वाहन चालविल्यामुळे २०१८ मध्ये २१ हजार ९१५ तर, यावर्षी ८ जानेवारीपर्यंत ५९५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहरात २०१७ मध्ये २५२ तर, २०१८ मध्ये २६५ प्राणांतिक अपघात झाले. शहरात ७५७ अनधिकृत गोठे असून त्यांच्या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात आतापर्यंत ३ हजार ६८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.मनपाकडे विविध मागण्यापोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये चौकामध्ये वाहतूक पोलिसांना उभे राहण्यासाठी बूथ तयार करून देण्यात यावेत, चौकात झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाईन आखण्यात याव्यात, नो पार्किंगचे फलक लावण्यात यावेत इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयtraffic policeवाहतूक पोलीस