शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

तोतलाडोह ४३.१३ टक्के भरला  : पाणीकपातीचे संकट दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:03 IST

मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

ठळक मुद्देनागपूर शहरातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मात्र बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने चौराईचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाल्याने नागपूर शहरावरील पाणीकपातीचे संकट दूर होणार आहे. प्रकल्पात ५५ ते ६० टक्के जलसाठा झाल्यास शेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.गेल्या २४ तासात तोतलाडोहचा पाणीसाठा ४ टक्क्यांनी वाढला आहे. तोतलाडोहाची एकूण क्षमता ११६६.९३.९३ दलघमी आहे, तर प्रकल्पात जलसाठा ४३८.६४ दलघमी झाला आहे. गेल्या वर्षी ४ सप्टेंबरपर्यत २७.२८ टक्के जलसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात १५.८५ टक्के अधिक जलसाठा झाला आहे. गणेशोत्सव विचारात घेता महापालिकेने १५ सप्टेंबरपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढेही कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, १५ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह प्रकल्पात फक्त २.५ टक्के जलसाठा होता. तो ४ सप्टेंबरला ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या १५ दिवसात ३८ टक्के जलसाठा झाला आहे. मध्य प्रदेशात पाऊ स सुरू राहिला तर तोतलाडोहातील जलसाठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात सुधारणा होत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. गेल्या वर्षी ३८.२४ टक्के जलसाठा होता. यंदा ३०.८६ टक्के आहे. कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१ दलघमी पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी