शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

तोतलाडोह ४३.१३ टक्के भरला  : पाणीकपातीचे संकट दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:03 IST

मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

ठळक मुद्देनागपूर शहरातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मात्र बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने चौराईचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाल्याने नागपूर शहरावरील पाणीकपातीचे संकट दूर होणार आहे. प्रकल्पात ५५ ते ६० टक्के जलसाठा झाल्यास शेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.गेल्या २४ तासात तोतलाडोहचा पाणीसाठा ४ टक्क्यांनी वाढला आहे. तोतलाडोहाची एकूण क्षमता ११६६.९३.९३ दलघमी आहे, तर प्रकल्पात जलसाठा ४३८.६४ दलघमी झाला आहे. गेल्या वर्षी ४ सप्टेंबरपर्यत २७.२८ टक्के जलसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात १५.८५ टक्के अधिक जलसाठा झाला आहे. गणेशोत्सव विचारात घेता महापालिकेने १५ सप्टेंबरपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढेही कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, १५ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह प्रकल्पात फक्त २.५ टक्के जलसाठा होता. तो ४ सप्टेंबरला ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या १५ दिवसात ३८ टक्के जलसाठा झाला आहे. मध्य प्रदेशात पाऊ स सुरू राहिला तर तोतलाडोहातील जलसाठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात सुधारणा होत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. गेल्या वर्षी ३८.२४ टक्के जलसाठा होता. यंदा ३०.८६ टक्के आहे. कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१ दलघमी पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी