शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

तोतलाडोह ४३.१३ टक्के भरला  : पाणीकपातीचे संकट दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:03 IST

मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

ठळक मुद्देनागपूर शहरातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मात्र बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने चौराईचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाल्याने नागपूर शहरावरील पाणीकपातीचे संकट दूर होणार आहे. प्रकल्पात ५५ ते ६० टक्के जलसाठा झाल्यास शेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.गेल्या २४ तासात तोतलाडोहचा पाणीसाठा ४ टक्क्यांनी वाढला आहे. तोतलाडोहाची एकूण क्षमता ११६६.९३.९३ दलघमी आहे, तर प्रकल्पात जलसाठा ४३८.६४ दलघमी झाला आहे. गेल्या वर्षी ४ सप्टेंबरपर्यत २७.२८ टक्के जलसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात १५.८५ टक्के अधिक जलसाठा झाला आहे. गणेशोत्सव विचारात घेता महापालिकेने १५ सप्टेंबरपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढेही कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, १५ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह प्रकल्पात फक्त २.५ टक्के जलसाठा होता. तो ४ सप्टेंबरला ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या १५ दिवसात ३८ टक्के जलसाठा झाला आहे. मध्य प्रदेशात पाऊ स सुरू राहिला तर तोतलाडोहातील जलसाठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात सुधारणा होत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. गेल्या वर्षी ३८.२४ टक्के जलसाठा होता. यंदा ३०.८६ टक्के आहे. कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१ दलघमी पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी