शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कडाक्याच्या थंडीत ३८३ खेळाडूंचे हाल

By admin | Updated: December 29, 2015 20:00 IST

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल ३८३ खेळाडूंचे सध्या बेहाल सुरू आहेत. पांघरुणाची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना रात्र कशीतरी कुडकुडत काढावी लागत आहे.

नरेंद्र कुकडे  - हिंगणाराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल ३८३ खेळाडूंचे सध्या बेहाल सुरू आहेत. पांघरुणाची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना रात्र कशीतरी कुडकुडत काढावी लागत आहे. त्यातल्या त्यात जेवणात वाढला जाणारा भात हा कच्चा, भाजीलासुद्धा चव नाही. गेल्या २१ डिसेंबरपासून या विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. क्रीडा स्पर्धेसाठी आलेले असले तरी क्रीडा स्पर्धाच सुरू न झाल्याने आणखी किती दिवस त्यांना कुडकुडत राहावे लागेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.हिंगणा तालुक्यातील कवडस येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील हा प्रकार आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सराव व्हावा म्हणून आठ प्रकल्पातील तब्बल ३८३ खेळाडू सध्या तेथे आलेले आहेत. २१ डिसेंबरपासून त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी कवडसच्या आदिवासी आश्रमशाळेकडे देण्यात आली आहे. परंतु, सुमार दर्जामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. कच्चा भात, भाजी आणि रात्रीच्या वेळी पांघरुणाची अपुरी व्यवस्था यामुळे असंख्य खेळाडू आजारी पडल्याचे वास्तवचित्र तेथे बघावयास मिळते.  

कुठले किती खेळाडू?

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आठ प्रकल्पातील ३८३ खेळाडू आलेले आहेत. त्यामध्ये नागपूर प्रकल्पातील १३ मुले व २१ मुली, चिमूर येथून ८ मुले व ८ मुली, भंडारा येथून १४ मुले व ९ मुली, चंद्रपूर येथून २० मुले व १९ मुली, अहेरी येथून २४ मुले व १९ मुली, गडचिरोली येथून ३५ मुले व ३२ मुली, देवरी येथून ३८ मुले व ४४ मुली, भामरागड येथून ४० मुले व ३४ मुली आलेले आहेत. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकल्पातील एकूण ३७ शिक्षक आलेले आहेत, त्यामध्ये २९ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहेत. परंतु, क्रीडा स्पर्धेची तारीख अनिश्चित आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्या सर्वांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  

कधी होणार स्पर्धा?

मानकापुरातील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय स्पर्धा होणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी ३ ते ५ जानेवारी २०१६ पर्यंतचा कालावधी ‘फिक्स’ करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळण्यास अडचण येत असल्याने स्पर्धेच्या तारखेबाबत अनिश्चितता असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याच गृहजिल्ह्यात खेळाडूंना होत असलेला त्रास आणि असुविधांबद्दल त्यांना माहिती मिळाल्यास त्यांच्यातर्फे निश्चितच कारवाई करण्यात येईल, हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र असे असताना विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून आदिवासी विभाग कशात गुंतला आहे, हे कळायला मार्ग नाही.