शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

कसला स्मार्ट सिटी प्रकल्प, १८ महिन्यांत होणारे काम चार वर्षांनंतरही अर्धवट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 17:43 IST

रस्त्यांचे काम २५ टक्के, तर पुलांच्या ७५ टक्के कामांना सुरुवातच नाही

राजीव सिंह

नागपूर : नामांकित कंत्राटदारांची नियक्ती करूनही पूर्व नागपुरातील नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली छळण्याचेच काम झाले आहे. वास्तविक १८ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना ४९ महिन्यांनंतरही एक तृतीयांश काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.

स्मार्ट सिटीच्या नावावर निवडणुका जिंकणारे आता प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे लोकांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आहे. त्यात पारडी उड्डाणपूल, मेट्रो रेल्वेचे कासव गतीने सुरू असल्याने त्रासात भर पडली आहे. ४९.७६ कि.मी. रस्त्यांपैकी फक्त १२.३६ कि.मी. रस्त्यांचे काम झाले आहे; तर २८ पुलांपैकी १० पुलांचे काम सुरू आहे.

स्मार्ट सिटीचा मोबदला व चुकीच्या आराखड्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी व स्मार्ट सिटी बोर्डाचे संचालक मंडळ दाट लोकवस्तीवरून रस्ता निर्माण करण्यासाठी आग्रही आहेत. पारडी ते कळमनादरम्यान २४ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. यामुळे ३०० घरे तुटणार आहे. काही रस्त्याखालून दूषित पाण्याची लाइन गेली आहे. अशा तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.

महिना अखेरीस निविदा काढणार - गोतमारे

शापूरजी पालोनजी यांनी प्रकल्पाचे काम बंद केले आहे. नवीन कंत्राटदार नियुक्तीसाठी महिनाअखेरीस निविदा काढण्याचे नियोजन आहे. काम तुकड्यात की एकत्र करावे, यावर संचालक मंडळा निर्णय घेईल. लकरच काम सुरू होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली.

  • १० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश देऊन शापूरजी पालोनजी कंपनीला स्मार्ट सिटीतील ६५० कोटींचे काम दिले.
  • १८ महिन्यांत ४९.७६ कि.मी.चे रस्ते, २८ पूल व ४ जलकुंभांचे निर्माण अपेक्षित होते.
  • ४९ महिन्यानंतरही १२.३६ कि.मी. रस्ते, १० पूल व ४ जलकुंभांचे काम सुरू.
  • कामे अपूर्ण असूनही कंपनीने ४४८.५८ कोटींच्या मोबदल्याची मागणी केली. संचालक मंडळाची १५.२५ कोटींचा मोबदला देण्याला सहमती.
  • पूर्व नागपुरातील पारडी, पूनापूर, भरतवाडा, भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्राचा प्रकल्पात समावेश.
टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर