शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

कांद्यासोबत आता टोमॅटोही होऊ लागलेत लाल; आवक कमी; भाव वाढले

By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 19, 2023 20:34 IST

दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे.

नागपूर : दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. पण यावर्षी पावसामुळे स्थानिक उत्पादकांचे टोमॅटोचे पीक खराब झाले. सध्या नागपूर जिल्हा वगळता महाराष्ट्राचा अन्य भाग आणि आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून टोमॅटो विक्रीसाठी नागपुरात येत आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमी असल्याने किरकोळमध्ये भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढत्या भावामुळे कांद्यासोबत आता टोमॅटोही लाल होऊ लागले आहेत.

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये असते स्थानिकांकडून आवक

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात स्थानिकांकडून आणि लगतच्या जिल्ह्यातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक असते. त्यामुळे भाव कमीच असतात. टोमॅटोची शेतातून तोडणी करून बाजारात विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना वाहतुकीचा दरही परवडत नाही. एवढे दर पडले असतात. याच कारणामुळे शेतकरी हिवाळ्यात बऱ्याचदा टोमॅटो रस्त्यावर फेकतात. अशी स्थिती यंदा नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे टोमॅटो खराब झाले आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमीच आहे. सध्या संगमनेर, मदनपल्ली (आंध्र) आणि बेंगळुरू येथून टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. ठोक बाजारात दर्जानुसार किलो भाव २५ ते ३० रुपये आहे. किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. नागपुरात दररोज २५ ट्रकची आवक आहेत. याउलट भाज्यांचे दर कमी आहेत. फूल कोबी ३०, पत्ता कोबी २० आणि वांगे १० रुपये किलो आहेत.

दीड महिन्यांपासून कांद्याचे भाव स्थिर

कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, कळमन्यात दररोज दक्षिण भारत, महाराष्ट्राच्या औरंगाबाद, नगर, सोलापूर या भागातून १८ ते २० ट्रकची आवक आहे. गुजरातेतून पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक विक्रीसाठी येत आहेत. कळमना ठोक बाजारात दर्जानुसार लाल कांदे ४० ते ५० रुपये आणि पांढऱ्या कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो आहेत. हे दर गेल्या दीड महिन्यांपासून स्थिर आहेत. मध्यंतरी ६० ते ७० रुपये किलोवर गेलेले दर सध्या कमी झाले आहेत. राज्याच्या धुळे आणि अन्य भागातून कांद्याची आवक वाढल्यानंतच भाव कमी होतील.

आवक वाढल्यानंतर भाव होतील कमी

विक्रेते भावेश वसानी म्हणाले, नवीन कांदे ४० ते ५० रुपये आणि जुन्या कांद्याचे भाव कमीच आहे. जुन्या कांद्याला मागणी कमी आहे. जुन्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण असून नवीन कांद्याचे भाव वाढू देत नाही. मध्यंतरी ६० ते ७० रूपयांपर्यंत वाढलेले भाव सध्या ४० ते ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील.