शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कांद्यासोबत आता टोमॅटोही होऊ लागलेत लाल; आवक कमी; भाव वाढले

By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 19, 2023 20:34 IST

दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे.

नागपूर : दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. पण यावर्षी पावसामुळे स्थानिक उत्पादकांचे टोमॅटोचे पीक खराब झाले. सध्या नागपूर जिल्हा वगळता महाराष्ट्राचा अन्य भाग आणि आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून टोमॅटो विक्रीसाठी नागपुरात येत आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमी असल्याने किरकोळमध्ये भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढत्या भावामुळे कांद्यासोबत आता टोमॅटोही लाल होऊ लागले आहेत.

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये असते स्थानिकांकडून आवक

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात स्थानिकांकडून आणि लगतच्या जिल्ह्यातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक असते. त्यामुळे भाव कमीच असतात. टोमॅटोची शेतातून तोडणी करून बाजारात विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना वाहतुकीचा दरही परवडत नाही. एवढे दर पडले असतात. याच कारणामुळे शेतकरी हिवाळ्यात बऱ्याचदा टोमॅटो रस्त्यावर फेकतात. अशी स्थिती यंदा नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे टोमॅटो खराब झाले आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमीच आहे. सध्या संगमनेर, मदनपल्ली (आंध्र) आणि बेंगळुरू येथून टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. ठोक बाजारात दर्जानुसार किलो भाव २५ ते ३० रुपये आहे. किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. नागपुरात दररोज २५ ट्रकची आवक आहेत. याउलट भाज्यांचे दर कमी आहेत. फूल कोबी ३०, पत्ता कोबी २० आणि वांगे १० रुपये किलो आहेत.

दीड महिन्यांपासून कांद्याचे भाव स्थिर

कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, कळमन्यात दररोज दक्षिण भारत, महाराष्ट्राच्या औरंगाबाद, नगर, सोलापूर या भागातून १८ ते २० ट्रकची आवक आहे. गुजरातेतून पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक विक्रीसाठी येत आहेत. कळमना ठोक बाजारात दर्जानुसार लाल कांदे ४० ते ५० रुपये आणि पांढऱ्या कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो आहेत. हे दर गेल्या दीड महिन्यांपासून स्थिर आहेत. मध्यंतरी ६० ते ७० रुपये किलोवर गेलेले दर सध्या कमी झाले आहेत. राज्याच्या धुळे आणि अन्य भागातून कांद्याची आवक वाढल्यानंतच भाव कमी होतील.

आवक वाढल्यानंतर भाव होतील कमी

विक्रेते भावेश वसानी म्हणाले, नवीन कांदे ४० ते ५० रुपये आणि जुन्या कांद्याचे भाव कमीच आहे. जुन्या कांद्याला मागणी कमी आहे. जुन्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण असून नवीन कांद्याचे भाव वाढू देत नाही. मध्यंतरी ६० ते ७० रूपयांपर्यंत वाढलेले भाव सध्या ४० ते ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील.