शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बाजारात टोमॅटोचा चिखल; घरासमोर २० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 22:53 IST

Nagpur News सध्या टाेमॅटाेचे दर कमालीचे काेसळल्याने पाच ते सात रुपये प्रतिकिलाे दराने एकमुस्त विकावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे, शहरातील आठवडी बाजारात १२ ते १५ रूपये तर दारावर २० रूपये प्रतिकिलाे दराने टाेमॅटाे खरेदी करावे लागत आहे.

नागपूर : सध्या टाेमॅटाेचे दर कमालीचे काेसळल्याने पाच ते सात रुपये प्रतिकिलाे दराने एकमुस्त विकावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे, शहरातील आठवडी बाजारात १२ ते १५ रूपये तर दारावर २० रूपये प्रतिकिलाे दराने टाेमॅटाे खरेदी करावे लागत आहे. उत्पादक आणि शहरी ग्राहकांना मिळणाऱ्या टाेमॅटाेच्या दरात माेठी तफावत असल्याचे दिसून येते.

मागील काही दिवसात टाेमॅटाेची बाजारातील आवक वाढल्याने तसेच मागणी स्थिर असल्याने टाेमॅटाेचे दर काेसळले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ग्रामीण अथवा शहरातील आठवडी बाजारात टाेमॅटाे विकायचे झाल्यास किमान १२ ते १५ रूपये दर मिळताे. मात्र, बाजारात टाेमॅटाेची आवक वाढत असल्याने बाजाराची संरचना थाेडी विस्कळीत हाेते आणि दर काेसळतात. त्याचा फटका टाेमॅटाे उत्पादकांना बसताे.

आवक वाढल्याने कळमना (नागपूर)सह जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये इतर भाजीपाल्याच्या तुलनेत टाेमॅटाेला सध्या कमी दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून, याला व्यापाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. टाेमॅटाे नाशिवंत असल्याने तसेच भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या टाेमॅटाेवर प्रक्रिया करणे शक्य नसल्याने त्याला तातडीने मिळेल त्या दरात विकावे लागते किंवा कुणी खरेदी न केल्यास उघड्यावर फेकावे लागते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

बाजार समित्यांमध्ये सरासरी ४ रूपये दर

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात टाेमॅटाे विकायचे झाल्यास किमान ३ आणि कमाल ८ रूपये प्रतिकिलाे दर मिळताे. गुरुवारी (दि. २३) कळमना (नागपूर) बाजार समितीत ८ रूपये, कामठी ५ रूपये, कळमेश्वर ७ रूपये तर रामटेक बाजार समितीत सरासरी ३ रूपये प्रतिकिलाे दराने टाेमॅटाेची विक्री करण्यात आली, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

घरासमोर २० रूपये किलो

बाजार समित्यांमध्ये टाेमॅटाेचे दर कमी असले तरी शहरातील आठवडी बाजारात टाेमॅटाेचे दर प्रतिकिलाे १२ ते १५ रूपये असून, नागपूर शहरात दारावर टाेमॅटाे खरेदी करावयाचे झाल्यास प्रतिकिलाेला २० रूपये माेजावे लागतात, अशी माहिती काही गृहिणींनी दिली. हीच अवस्था तालुक्याच्या ठिकाणी असून, तेथील व गावांमधील गृहिणी दारावर टाेमॅटाे खरेदी करण्यापेक्षा आठवडी बाजारातून खरेदी करण्यावर अधिक भर देतात.

उत्पादन खर्च दूरच, वाहतूक खर्चही निघेना

यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे टाेमॅटाेवर कीड व राेगाचा प्रादुर्भाव झाला हाेता. त्यातून पीक वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागल्याने उत्पादन खर्च वाढला. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चातही माेठी वाढ झाली आहे. मात्र, तुलनेत दर मिळत नसल्याने टाेमॅटाेचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी मार्च ते मे महिन्यात भाजीपाल्याला चांगले दर मिळतात. त्याअनुषंगाने टाेमॅटाेची लागवड केली. मात्र, यावर्षी बाजारात आवक वाढल्याने दर काेसळले. त्यामुळे टाेमॅटाे फेकून देण्याची वेळ आली आहे.

- विनायक वाडबुदे, शेतकरी.

भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढउतार असते. त्यामुळे कधी चांगला दर मिळताे तर कधी कवडीमाेल दराने विकावा लागताे. शिवाय, हवामानातील बदल उत्पादन व दर प्रभावित करते.

- ओम खाेजरे.

टॅग्स :vegetableभाज्या