शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

आज, समाजाला माणूस जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज : डॉ. विजय कुवळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:12 IST

कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसानप, देशमुख, लोखंडे आणि डॉ. मिर्झा यांना साहित्य पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनच्यावतीने साहित्य पुरस्कारांचे वितरण मंगळवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी, ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. किशोर सानप यांना ‘मल्हारराव काळे समीक्षा पुरस्कार’, डॉ. सदानंद देशमुख यांना ‘मीरादेवी पिंचा स्मृती लेखक पुरस्कार’, डॉ. भाऊ लोखंडे यांना ‘डॉ. गिरीश गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार’ आणि डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना ‘पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके, कार्याध्यक्ष श्रीराम काळे, अनिल हिरेखण आणि प्रेक्षकांमध्ये गिरीश गांधी उपस्थित होते.समाजात प्रत्येक गोष्टी माणूसकेंद्री आहेत आणि अशा माणसाचा विचार साहित्यिक करत असतात. माणूस वाचणे आणि माणुसकी वाचवण्याची प्रेरणा साहित्य देत असते. साहित्यिकांच्या सगळ्या विचारांच्या नद्या समाजहितकारी समुद्राला जाऊन मिळतात. वाचक व रसिकाला स्वत:बरोबर वाहून नेणारा प्रवाह म्हणजे साहित्यिक असल्याचे कुवळेकर यावेळी म्हणाले. प्रास्ताविक गजानन नारे यांनी केले. तर, संचालक रेखा दंडिगे-घिया यांनी केले.मराठीत विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुले - डॉ. मिर्झामराठीमध्ये विनोदी कवितांना भावच नाही. जणू, विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुलेच असल्यासारखे समजले जाते. विनोदी कवितांना कधी गुलाबाची फुले होता आले नाही, अशी मराठी साहित्याची शोकांतिका डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी यावेळी विनोदी शैलीतच उलगडून दाखवली. हिंदीमध्ये मात्र विनोदी कवितांना प्रचंड भाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर