शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आज, समाजाला माणूस जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज : डॉ. विजय कुवळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:12 IST

कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसानप, देशमुख, लोखंडे आणि डॉ. मिर्झा यांना साहित्य पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनच्यावतीने साहित्य पुरस्कारांचे वितरण मंगळवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी, ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. किशोर सानप यांना ‘मल्हारराव काळे समीक्षा पुरस्कार’, डॉ. सदानंद देशमुख यांना ‘मीरादेवी पिंचा स्मृती लेखक पुरस्कार’, डॉ. भाऊ लोखंडे यांना ‘डॉ. गिरीश गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार’ आणि डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना ‘पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके, कार्याध्यक्ष श्रीराम काळे, अनिल हिरेखण आणि प्रेक्षकांमध्ये गिरीश गांधी उपस्थित होते.समाजात प्रत्येक गोष्टी माणूसकेंद्री आहेत आणि अशा माणसाचा विचार साहित्यिक करत असतात. माणूस वाचणे आणि माणुसकी वाचवण्याची प्रेरणा साहित्य देत असते. साहित्यिकांच्या सगळ्या विचारांच्या नद्या समाजहितकारी समुद्राला जाऊन मिळतात. वाचक व रसिकाला स्वत:बरोबर वाहून नेणारा प्रवाह म्हणजे साहित्यिक असल्याचे कुवळेकर यावेळी म्हणाले. प्रास्ताविक गजानन नारे यांनी केले. तर, संचालक रेखा दंडिगे-घिया यांनी केले.मराठीत विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुले - डॉ. मिर्झामराठीमध्ये विनोदी कवितांना भावच नाही. जणू, विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुलेच असल्यासारखे समजले जाते. विनोदी कवितांना कधी गुलाबाची फुले होता आले नाही, अशी मराठी साहित्याची शोकांतिका डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी यावेळी विनोदी शैलीतच उलगडून दाखवली. हिंदीमध्ये मात्र विनोदी कवितांना प्रचंड भाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर