शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आज, समाजाला माणूस जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज : डॉ. विजय कुवळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:12 IST

कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसानप, देशमुख, लोखंडे आणि डॉ. मिर्झा यांना साहित्य पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनच्यावतीने साहित्य पुरस्कारांचे वितरण मंगळवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी, ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. किशोर सानप यांना ‘मल्हारराव काळे समीक्षा पुरस्कार’, डॉ. सदानंद देशमुख यांना ‘मीरादेवी पिंचा स्मृती लेखक पुरस्कार’, डॉ. भाऊ लोखंडे यांना ‘डॉ. गिरीश गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार’ आणि डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना ‘पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके, कार्याध्यक्ष श्रीराम काळे, अनिल हिरेखण आणि प्रेक्षकांमध्ये गिरीश गांधी उपस्थित होते.समाजात प्रत्येक गोष्टी माणूसकेंद्री आहेत आणि अशा माणसाचा विचार साहित्यिक करत असतात. माणूस वाचणे आणि माणुसकी वाचवण्याची प्रेरणा साहित्य देत असते. साहित्यिकांच्या सगळ्या विचारांच्या नद्या समाजहितकारी समुद्राला जाऊन मिळतात. वाचक व रसिकाला स्वत:बरोबर वाहून नेणारा प्रवाह म्हणजे साहित्यिक असल्याचे कुवळेकर यावेळी म्हणाले. प्रास्ताविक गजानन नारे यांनी केले. तर, संचालक रेखा दंडिगे-घिया यांनी केले.मराठीत विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुले - डॉ. मिर्झामराठीमध्ये विनोदी कवितांना भावच नाही. जणू, विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुलेच असल्यासारखे समजले जाते. विनोदी कवितांना कधी गुलाबाची फुले होता आले नाही, अशी मराठी साहित्याची शोकांतिका डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी यावेळी विनोदी शैलीतच उलगडून दाखवली. हिंदीमध्ये मात्र विनोदी कवितांना प्रचंड भाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर