शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आज देशाला बौद्ध धम्माची नितांत गरज :  भदंत संघसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:32 IST

तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह लद्दाख व जम्मू काश्मिरचे प्रमुख भदंत संघसेना यांनी केले.

ठळक मुद्दे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह लद्दाख व जम्मू काश्मिरचे प्रमुख भदंत संघसेना यांनी केले.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस कामठी येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भिक्खूनी मायाआॅन कातायामा (जपान), भदंत एम. मेधंकर (श्रीलंका), भदंत सयोडो शिरींघ (म्यानमार), भदंत थीच नाट टू (व्हिएतनाम), भदंत सोबिता (नेदरलँड), भदंत उपालडेल नामग्याल (तिबेट), भदंत प्रमहा अनेक उदोम धम्मकित्ती आणि आमदार मिलिंद माने प्रमुख अतिथी होते.यावेळी ‘जागतिक शांती व मानव कल्याणाकरिता बौद्ध धम्माची’ आवश्यकता या विषयावर परिसंवाद पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती होती.प्रास्ताविक केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले. वंदना भगत यांनी आभार मानले. बरीएम जिल्हाध्यक्ष अजय कदम , दीपंकर गणवीर, नंदा गोडघाटे, रेखा भावे, रजनी लिंगायत, उदास बन्सोड, नारायण नितनवरे, देवचंद डांगे, मोरेश्वर पाटील, स्नेहलता गजभिये आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhammbhumiधम्मभूमीnagpurनागपूर