शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

तंबाखू सेवन विरोधी दिवस; तंबाखूमुळे दरवर्षी सव्वा लाख बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 09:47 IST

भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे ८५ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो तर बिडीमुळे ७३ हजार लोक फुफ्फुसाच्या कर्करोगांना बळी पडतात.

ठळक मुद्दे८५ हजार लोकांना तोंडाचा७३ हजार लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे ८५ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो तर बिडीमुळे ७३ हजार लोक फुफ्फुसाच्या कर्करोगांना बळी पडतात. साधारण १ लाख ६० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळून येतात. यातील १ लाख २५ हजार लोकांचा या आजाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.संगत म्हणा, ‘स्टाईल स्टेटमेंट’ म्हणा किंवा केवळ उत्सुकतेतून केलेला प्रयोग म्हणा, मात्र तंबाखू आणि सिगरेटच्या नादाला लागून प्रौढांसोबतच युवावर्गाचा ºहास होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.विशेष म्हणजे या व्यसनामध्ये अडकणाऱ्या अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत आहेत. तरीदेखील तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्करोग विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे यांनी सांगितले, भारतात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग रुग्णात १० टक्क्यांनी वाढ होत आहे. एकट्या नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ४०-४५ टक्के रुग्ण दिसून येत आहे. तंबाखूमुळे भारतात वर्षाकाठी साधारण ८५ हजार रुग्ण तोंडाच्या कर्करोगाने तर बीडी व सिगारेटमुळे ७३ हजार रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी पडत आहे. यात महिलांचे प्रमाणही वाढत आहे.

तंबाखूमधील ६९ घटक देतात कॅन्सरला आमंत्रण-डॉ. मानधनियाकर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, तंबाखूमध्ये ४ हजार ८०० रासायनिक घटक असतात. यातील ६९ घटक कॅन्सरला आमंत्रण देणारे असतात. कॅन्सरशिवाय तंबाखू हे हृदयरोग, पक्षाघात, अस्थमाचेही मुख्य कारण ठरत आहे. हे व्यंधत्व, पेप्टीक अल्सर यालाही कारणीभूत ठरते. धूम्रपानामुळे रक्तामधील आॅक्सिजनची मात्रा कमी होते.

गेल्या वर्षी मुखकर्करोगाचे १५१ रुग्ण-डॉ. गणवीरशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांच्यानुसार, तंबाखूमुळे होणाºया कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. शा. दंत रुग्णालयात २०१३ मध्ये मुखकर्करोगाचे ६८ रुग्ण, २०१४ मध्ये ८१ रुग्ण, २०१५ मध्ये १३४ रुग्ण, २१०६ मध्ये १९० रुग्ण, २०१७ मध्ये ७८ रुग्ण तर गेल्या वर्षी २०१८ मध्ये १५१ रुग्णांची नोंद झाली आहे. यात युवकांची संख्या सर्वाधिक आहे.

तंबाखूची अखाद्य पदार्थ म्हणून नोंद व्हावी-डॉ. कांबळेडॉ. कांबळे म्हणाले, भारतात खाद्य पदार्थांमध्ये तंबाखूचीही नोंद आहे. शासनाने याला अखाद्य पदार्थ म्हणून याची नोंद करावी व जास्तीत जास्त कर आकारावा. दारु, तंबाखूच्या उत्पन्नातून शासनाला मिळणारा एका वर्षाच्या करातून नवीन अद्ययावत कर्करोग रुग्णालय स्थापन करावे. कर्करोगाच्या वेदनेवर ती फुंकर ठरेल.

टॅग्स :Healthआरोग्य