शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य विकसित करण्याची वेळ- देवेंद्र फडणवीस

By निशांत वानखेडे | Updated: September 17, 2023 18:36 IST

आयटीआय विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ

नागपूर : भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आले आहे व संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अशावेळी जगाच्या गरजेनुसार काैशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उद्याेग व आयटीआय यांचे समन्वय साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य असलेले मनुष्यबळ निर्मिती करणे, ही काैशल्य शिक्षण व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने आयटीआय प्रशिक्षणार्थिंचा दीक्षांत समारंभ रविवारी आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी काैशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लाेढा, या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषाेत्तम देवतळे, आमदार माेहन मते, आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी विदर्भातील आयटीआयच्या विविध ट्रेडमधून गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांना पदक व मानचिन्ह व शेकडाे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, डिग्री महत्त्वाची आहे पण त्यापेक्षा काैशल्याचे महत्त्व अधिक आहे. येत्या काळात इंजिनीयर पदवीधरापेक्षा आयटीआयचे काैशल्य प्रशिक्षित उमेदवारांना मागणी अधिक राहिल. पूर्वी बारा बलुतेदार म्हणून ओळख असलेल्या कारागिरींवर गावांची अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण हाेती. कालाैघात या काैशल्याला आधुनिक जाेड मिळाली नाही, त्यामुळे गावगाडे काेसळले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पीएम विश्वकर्मा याेजना सुरू केली आहे, ज्याद्वारे १८ वेगवेगळ्या व्यवसायासाठी काैशल्य प्रशिक्षण व उद्याेगासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. याप्रकारे तंत्रज्ञानयुक्त बारा बलुतेदार व्यवस्थेतून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित करण्यात येईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

मंगल प्रभात लाेढा यांनी पुढच्या दाेन वर्षात आयआयटीपेक्षा आयटीआयचे महत्त्व वाढेल व आयआयटीची मुले आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यास येतील, असा दावा केला. येत्या काही दिवसात गावागावात शेकडाे काैशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल. येणाऱ्या ‘व्हाईट स्काॅलर’ नाही परिश्रम करणाऱ्यांना सन्मान मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक दिगंबर दळवी यांनी केले तर आशिष कुमार सिंग यांनी आभार मानले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर