शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य विकसित करण्याची वेळ- देवेंद्र फडणवीस

By निशांत वानखेडे | Updated: September 17, 2023 18:36 IST

आयटीआय विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ

नागपूर : भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आले आहे व संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अशावेळी जगाच्या गरजेनुसार काैशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उद्याेग व आयटीआय यांचे समन्वय साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य असलेले मनुष्यबळ निर्मिती करणे, ही काैशल्य शिक्षण व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने आयटीआय प्रशिक्षणार्थिंचा दीक्षांत समारंभ रविवारी आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी काैशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लाेढा, या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषाेत्तम देवतळे, आमदार माेहन मते, आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी विदर्भातील आयटीआयच्या विविध ट्रेडमधून गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांना पदक व मानचिन्ह व शेकडाे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, डिग्री महत्त्वाची आहे पण त्यापेक्षा काैशल्याचे महत्त्व अधिक आहे. येत्या काळात इंजिनीयर पदवीधरापेक्षा आयटीआयचे काैशल्य प्रशिक्षित उमेदवारांना मागणी अधिक राहिल. पूर्वी बारा बलुतेदार म्हणून ओळख असलेल्या कारागिरींवर गावांची अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण हाेती. कालाैघात या काैशल्याला आधुनिक जाेड मिळाली नाही, त्यामुळे गावगाडे काेसळले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पीएम विश्वकर्मा याेजना सुरू केली आहे, ज्याद्वारे १८ वेगवेगळ्या व्यवसायासाठी काैशल्य प्रशिक्षण व उद्याेगासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. याप्रकारे तंत्रज्ञानयुक्त बारा बलुतेदार व्यवस्थेतून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित करण्यात येईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

मंगल प्रभात लाेढा यांनी पुढच्या दाेन वर्षात आयआयटीपेक्षा आयटीआयचे महत्त्व वाढेल व आयआयटीची मुले आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यास येतील, असा दावा केला. येत्या काही दिवसात गावागावात शेकडाे काैशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल. येणाऱ्या ‘व्हाईट स्काॅलर’ नाही परिश्रम करणाऱ्यांना सन्मान मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक दिगंबर दळवी यांनी केले तर आशिष कुमार सिंग यांनी आभार मानले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर