शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य विकसित करण्याची वेळ- देवेंद्र फडणवीस

By निशांत वानखेडे | Updated: September 17, 2023 18:36 IST

आयटीआय विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ

नागपूर : भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आले आहे व संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अशावेळी जगाच्या गरजेनुसार काैशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उद्याेग व आयटीआय यांचे समन्वय साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य असलेले मनुष्यबळ निर्मिती करणे, ही काैशल्य शिक्षण व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने आयटीआय प्रशिक्षणार्थिंचा दीक्षांत समारंभ रविवारी आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी काैशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लाेढा, या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषाेत्तम देवतळे, आमदार माेहन मते, आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी विदर्भातील आयटीआयच्या विविध ट्रेडमधून गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांना पदक व मानचिन्ह व शेकडाे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, डिग्री महत्त्वाची आहे पण त्यापेक्षा काैशल्याचे महत्त्व अधिक आहे. येत्या काळात इंजिनीयर पदवीधरापेक्षा आयटीआयचे काैशल्य प्रशिक्षित उमेदवारांना मागणी अधिक राहिल. पूर्वी बारा बलुतेदार म्हणून ओळख असलेल्या कारागिरींवर गावांची अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण हाेती. कालाैघात या काैशल्याला आधुनिक जाेड मिळाली नाही, त्यामुळे गावगाडे काेसळले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पीएम विश्वकर्मा याेजना सुरू केली आहे, ज्याद्वारे १८ वेगवेगळ्या व्यवसायासाठी काैशल्य प्रशिक्षण व उद्याेगासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. याप्रकारे तंत्रज्ञानयुक्त बारा बलुतेदार व्यवस्थेतून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित करण्यात येईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

मंगल प्रभात लाेढा यांनी पुढच्या दाेन वर्षात आयआयटीपेक्षा आयटीआयचे महत्त्व वाढेल व आयआयटीची मुले आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यास येतील, असा दावा केला. येत्या काही दिवसात गावागावात शेकडाे काैशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल. येणाऱ्या ‘व्हाईट स्काॅलर’ नाही परिश्रम करणाऱ्यांना सन्मान मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक दिगंबर दळवी यांनी केले तर आशिष कुमार सिंग यांनी आभार मानले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर