शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

काम नसल्याने कुलींवर उपासमारीची वेळ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे प्रवासी आपले साहित्य कुलींना देणे टाळत आहेत. अशास्थितीत कुलींना काम मिळत नसून, त्यांच्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे प्रवासी आपले साहित्य कुलींना देणे टाळत आहेत. अशास्थितीत कुलींना काम मिळत नसून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकावर सध्या १४५ कुली दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत. एका शिफ्टमध्ये ७२ कुली काम करतात. सध्या कोरोनामुळे प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. प्रवाशांचा कमी प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्याही रद्द करण्यात येत आहेत. केवळ आवश्यक काम असलेले प्रवासीच प्रवास करत आहेत. परंतु, कोरोनाच्या धास्तीने ते कुलींकडे आपले सामान देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर कामासाठी आलेल्या कुलींना रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ येत आहे. रोजगारच नसल्यामुळे घरगाडा कसा चालवावा, असा प्रश्न कुलींना पडला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाने अशा कठीण परिस्थितीत कुलींना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.

नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवासी कोरोनामुळे कुलींना काम देण्याचे टाळत आहेत. यामुळे कुलींना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागत आहे. त्यामुळे कुलींवर उपासमारीची वेळ आली आहे.

- अब्दुल माजिद खान, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे भारवाहक संघ