शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०११ पर्यंतचे अतिक्रमण होणार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:57 IST

एखाद्याने राज्यात १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधले असेल तर आता त्याला चिंता करायची गरज नाही. राज्य सरकारने या तारखेपर्यंत करण्यात आलेल्या अतिक्रमणांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यात अतिक्रमणधारकांना दिलासा मिळेल जे पंतप्रधान घरकुल योजनेसाठी पात्र ठरले असतील, आणि जे अतिक्रमण केलेल्या बांधकामाचा उपयोग निवासासाठी करीत आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाच लाभआता शहरातील अतिक्रमणधारकांनाही दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्याने राज्यात १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधले असेल तर आता त्याला चिंता करायची गरज नाही. राज्य सरकारने या तारखेपर्यंत करण्यात आलेल्या अतिक्रमणांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यात अतिक्रमणधारकांना दिलासा मिळेल जे पंतप्रधान घरकुल योजनेसाठी पात्र ठरले असतील, आणि जे अतिक्रमण केलेल्या बांधकामाचा उपयोग निवासासाठी करीत आहेत.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अतिक्रमणांना नियमित करण्याचा निर्णय सरकारने नागपुरात मान्सून अधिवेशनात घेतला होता. आता शहरातील अतिक्रमणांनाही नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नगर विकास विभागाने गुरुवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केले आहे. यात स्पष्ट करण्यात आले आहे की, केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण अवलंबिले आहे. केंद्र सरकारने महराष्ट्रातील ३८२ शहरांमध्ये आणि त्याला लागून असलेल्या भागात पंतप्रधान घरकुल योजनेला मंजुरी दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत ही बाब उघडकीस आली की अनेकांकडे स्वत:च्या नावावर जमीन नाही. परंतु ते ज्या जागेवर राहत आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने १३ नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत अशा अतिक्रमणांना नियमानुसार नियमित करण्याचा निर्णय घेतला. शासन निर्णयात म्हटले आहे की, केवळ महसूल विभागांतर्गत असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणच नियमित करण्यात येणार आहे. यासोबतच अतिक्रमणधारकांचे पंतप्रधान घरकुल योजनेसाठी पात्र होणेही आवश्यक आहे.समित्यांचे गठनमहापालिका क्षेत्र आणि अ, ब व क श्रेणीच्या नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमणांना नियमित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने समित्यांचे गठन केले आहे. यात मनपा आणि अ वर्ग नगर परिषदेतील अतिक्रमणांना नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीला दिले आहे. या समितीमध्ये जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक आणि मनपा आयुक्त, उपायुक्त, किंवा न.प. चे मुख्याधिकारी सदस्य सचिव राहतील. तसेच ब आणि क श्रणी नगर परिषद व नगर पंचायतीसाठी गठित समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी राहतील. या समितीत नगर परिषद व नगर पंचायतचे मुख्याधिकारी सदस्य सचिव राहतील. भूमी अभिलेख उपअधीक्षक सदस्य राहतील.

ठळक वैशिष्ट्ये

  • १ जानेवारी २०११ पूर्वीचे अतिक्रमण असावे
  • अतिक्रमणाचा उपयोग केवळ निवासासाठी असायला हवा
  • केवळ १५०० वर्गफुटाचे अतिक्रमणच नियमित होणार
  • अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी अतिक्रमणधारकांकडून कब्जा अधिकाराची रक्कम घेतली जाणार नाही.
  • उर्वरित वर्गाकडून ५०० वर्गफूट जागेपर्यंतच्याच कब्जा अधिकार रक्कम घेतली जाईल.
  • ५०० ते १००० वर्गफुटाला रेडिरेकनरच्या मूल्याच्या १० टक्के रक्कम घेतली जाईल.
  • १००० वर्गफूटपेक्षा अधिक जमिनीसाठी रेडिरेकनरच्या २५ टक्के रक्कम वसूल कली जाईल.
  • सीआरझेड, नॉन डेव्हलपमेंट परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण नियमित होणार नाही.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर