शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

टिकेकरांनी अभिजातपणा जोपासला

By admin | Updated: January 24, 2016 02:43 IST

भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, ...

श्रीपाद जोशी : अरुण टिकेकर यांना श्रद्धांजलीनागपूर : भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, याची जाणीव एक संपादक म्हणून डॉ. अरुण टिकेकरांना होती. व्यावसायिकता वाढलेल्या काळातही डॉ. टिकेकरांनी पत्रकारितेतील अभिजातपणा आणि सत्यता जपली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.डॉ. अरुण टिकेकर यांच्या श्रद्धांजली सभेत अध्यक्षस्थानी बोलतांना श्रीपाद जोशी यांनी टिकेकरांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांच्या अभिजातपणामुळे बॉस म्हणून वागण्यात कडकपणा आला असेल, मात्र बौद्धिक अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही. वाचकांना जे हवे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने केले. टिकेकरांमुळेच वृत्तांत किंवा पुरवणी पत्रकारितेचा उगम झाल्याचे जोशी म्हणाले. डॉ. टिकेकर यांनी इतिहासाला वेगळी दिशा दिली. पुणे शहर इतिहास ग्रंथाचे उदाहरण देत स्थानिक सामान्य माणसांच्या भावभावना, जडणघडण, त्यांच्या संस्कृतीची सत्यता इतिहास रुपाने संपादित करण्याचे मोलाचे योगदान डॉ. टिकेकरांनी दिले असून विदर्भाचा इतिहास लिहिताना टिकेकरांचे कार्य प्रेरणा देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली सभेच्यावेळी डॉ. टिकेकर यांची ज्येष्ठ बहीण सुनंदा मोहनी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कौटुंबिक जडणघडणीच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. आजोबा, वडील आणि काका विचारवंत होते आणि या सर्वांनी निर्भिडपणे आपले विचार स्पष्टपणे समाजासमोर मांडले. त्यांचा ग्रंथप्रेमाचा आणि व्यासंगतेचा हाच वारसा अरुणने पुढे चालविल्याचे त्या म्हणाल्या. अरुण आणि आमच्या तीन पिढ्यांनी नवे विचार स्पष्टपणे मांडून विवेकाचा जागर केल्याचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र मोठ्या बहिणीने लहान भावाला श्रद्धांजली अर्पण करण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुनंदा मोहनी यांचे पती दिवाकर मोहनी यांनीही आपले विचार मांडले. डॉ. टिकेकरांना गुरू मानणारे सुरेश भुसारी यांनी संपादकाची ओळख फोटोतून नाही तर लेखणीतून झाली पाहिजे, असे सांगणारे अरुण टिकेकर उदारमतवादाला समोर नेणारे संपादक असल्याची भावना व्यक्त केली. श्रद्धांजली सभेचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.(प्रतिनिधी)