शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

टिकेकरांनी अभिजातपणा जोपासला

By admin | Updated: January 24, 2016 02:43 IST

भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, ...

श्रीपाद जोशी : अरुण टिकेकर यांना श्रद्धांजलीनागपूर : भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, याची जाणीव एक संपादक म्हणून डॉ. अरुण टिकेकरांना होती. व्यावसायिकता वाढलेल्या काळातही डॉ. टिकेकरांनी पत्रकारितेतील अभिजातपणा आणि सत्यता जपली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.डॉ. अरुण टिकेकर यांच्या श्रद्धांजली सभेत अध्यक्षस्थानी बोलतांना श्रीपाद जोशी यांनी टिकेकरांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांच्या अभिजातपणामुळे बॉस म्हणून वागण्यात कडकपणा आला असेल, मात्र बौद्धिक अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही. वाचकांना जे हवे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने केले. टिकेकरांमुळेच वृत्तांत किंवा पुरवणी पत्रकारितेचा उगम झाल्याचे जोशी म्हणाले. डॉ. टिकेकर यांनी इतिहासाला वेगळी दिशा दिली. पुणे शहर इतिहास ग्रंथाचे उदाहरण देत स्थानिक सामान्य माणसांच्या भावभावना, जडणघडण, त्यांच्या संस्कृतीची सत्यता इतिहास रुपाने संपादित करण्याचे मोलाचे योगदान डॉ. टिकेकरांनी दिले असून विदर्भाचा इतिहास लिहिताना टिकेकरांचे कार्य प्रेरणा देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली सभेच्यावेळी डॉ. टिकेकर यांची ज्येष्ठ बहीण सुनंदा मोहनी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कौटुंबिक जडणघडणीच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. आजोबा, वडील आणि काका विचारवंत होते आणि या सर्वांनी निर्भिडपणे आपले विचार स्पष्टपणे समाजासमोर मांडले. त्यांचा ग्रंथप्रेमाचा आणि व्यासंगतेचा हाच वारसा अरुणने पुढे चालविल्याचे त्या म्हणाल्या. अरुण आणि आमच्या तीन पिढ्यांनी नवे विचार स्पष्टपणे मांडून विवेकाचा जागर केल्याचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र मोठ्या बहिणीने लहान भावाला श्रद्धांजली अर्पण करण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुनंदा मोहनी यांचे पती दिवाकर मोहनी यांनीही आपले विचार मांडले. डॉ. टिकेकरांना गुरू मानणारे सुरेश भुसारी यांनी संपादकाची ओळख फोटोतून नाही तर लेखणीतून झाली पाहिजे, असे सांगणारे अरुण टिकेकर उदारमतवादाला समोर नेणारे संपादक असल्याची भावना व्यक्त केली. श्रद्धांजली सभेचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.(प्रतिनिधी)