शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

गाळात फसून वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 20:24 IST

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील मानसिंगदेव अभयारण्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार) : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचामृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे नियमित गस्त करत असताना वनपाल जीवन पवार आणि इतर वनरक्षक यांना एक प्रौढ वाघ गाळात फसलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर,उपसंचालक अमलेंदू पाठक, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी अनिल दशहरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध नंदागवळी, डॉ. चेतन पातोंड, डॉ. विनोद समर्थ, सहायक वन संरक्षक (अतिरिक्त कार्यभार) अतुल देवकर घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीपासून ५०० मीटर परिघामध्ये तपास केला असता कोणत्याही प्रकारची अवैध बाब त्यांना आढळून आली नाही. वाघिणीचे चारी पाय खोल गाळात फसलेले आढळून आले तसेच तोंडाचा भाग तसेच शरीराचा भाग देखील गाळात फसल्याचा दिसून आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. प्राथमिक परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाघिणीचा मृत्यू हा दलदलीत अडकल्याने आणि श्वासनावरोधाने झाला असल्याचे दिसून येते. सादर वाघिण ही घटनास्थळाकडे येत असतानाच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या आहे. उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाघिणीचे नखे, सुळे आणि इतर सर्व अवयव मूळ जागेवर आढळून आले. शवविच्छेदनानंतर अधिकाऱ्यांच्या समक्ष वाघिणीचे दहन करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थानच्या संशोधक आकांक्षा यांनी सदर वाघिणीची ओळख पटविली. त्यांच्या सांगण्यानुसार सदर वाघिण अलीकडेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आली होती.मृत्यू किती दिवसांपूर्वी ?ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बहुतेक सात ते आठ दिवसापूर्वीची असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र या परिसरात जर वनविभागाची नियमित गस्त असेल तर त्यांना ही बाब उशिरा का लक्षात आली, हा प्रश्नच आहे. यासोबत गाळात फसलेल्या वाघिणीने स्वत:ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही का, हाही एक प्रश्न आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू