शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

गाळात फसून वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 20:24 IST

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील मानसिंगदेव अभयारण्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार) : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचामृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे नियमित गस्त करत असताना वनपाल जीवन पवार आणि इतर वनरक्षक यांना एक प्रौढ वाघ गाळात फसलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर,उपसंचालक अमलेंदू पाठक, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी अनिल दशहरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध नंदागवळी, डॉ. चेतन पातोंड, डॉ. विनोद समर्थ, सहायक वन संरक्षक (अतिरिक्त कार्यभार) अतुल देवकर घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीपासून ५०० मीटर परिघामध्ये तपास केला असता कोणत्याही प्रकारची अवैध बाब त्यांना आढळून आली नाही. वाघिणीचे चारी पाय खोल गाळात फसलेले आढळून आले तसेच तोंडाचा भाग तसेच शरीराचा भाग देखील गाळात फसल्याचा दिसून आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. प्राथमिक परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाघिणीचा मृत्यू हा दलदलीत अडकल्याने आणि श्वासनावरोधाने झाला असल्याचे दिसून येते. सादर वाघिण ही घटनास्थळाकडे येत असतानाच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या आहे. उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाघिणीचे नखे, सुळे आणि इतर सर्व अवयव मूळ जागेवर आढळून आले. शवविच्छेदनानंतर अधिकाऱ्यांच्या समक्ष वाघिणीचे दहन करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थानच्या संशोधक आकांक्षा यांनी सदर वाघिणीची ओळख पटविली. त्यांच्या सांगण्यानुसार सदर वाघिण अलीकडेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आली होती.मृत्यू किती दिवसांपूर्वी ?ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बहुतेक सात ते आठ दिवसापूर्वीची असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र या परिसरात जर वनविभागाची नियमित गस्त असेल तर त्यांना ही बाब उशिरा का लक्षात आली, हा प्रश्नच आहे. यासोबत गाळात फसलेल्या वाघिणीने स्वत:ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही का, हाही एक प्रश्न आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू