शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

वाघांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग धोक्यात : नवीन अधिवासाच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 21:02 IST

विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत.

ठळक मुद्देवनसीमा ओलांडून वाघ शेतशिवारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील जंगलांमध्येवाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. भंडारा जिल्ह्यातील बपेरा येथील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे अशाप्रकारची शक्यता आता वन्यजीव अभ्यासक व्यक्त करीत आहेत.तीन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील बिनाखी या गावालगतच्या शेतशिवारात आलेल्या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी झाले. प्रत्यक्षात या गावाला लागून जंगल नाही. त्यामुळे या गावच्या शेतशिवारात वाघ येईल, याची सूतराम कल्पना कुणालाच नव्हती. मात्र शेतशिवारावर वाघ आल्याचे कळल्यावर गावकऱ्यांंनी गर्दी केली. वाघाला हुसकावून लावण्यासाठी काठ्या, दगडधोंडे फेकून मारले. त्यामुळे बिथरलेल्या वाघाने गर्दीवर हल्ला केला.हे गाव मात्र पूर्वेला असलेल्या न्यू नागझिरा वाईल्डलाईफ सेंच्युरी आणि पश्चिमेला असलेल्या पेंच नॅशनल पार्क या दोन जंगलांच्या मध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. या भागातील वाघांचे नैसर्गिक कॉरिडॉर (भ्रमणमार्ग) जवळपास नष्ट झालेले आहेत. पेंच आणि न्यू नागझिरामध्ये वाघांची संख्या बºयापैकी आहे. भंडारा विभागात मागील वर्षी सात वाघांची नोंद झाली आहे. वाढलेले नर वाघ आपला नवा अधिवास शोधण्यासाठी बाहेर पडतात. दोन जंगलांना लागून असलेल्या झाडीतून मार्ग काढत वाघ आपल्या पुढच्या नियोजित जंगलात पोहचतात. मात्र जंगलांना जोडणाºया वृक्षांची आणि झाडांची तोड झाल्याने वाघांचे भ्रमणमार्ग बाधित झाले आहेत. परिणामत: वाघांना मार्ग शोधण्यासाठी शेतशिवारांचा वापर करावा लागत आहे.वाघ शोधताहेत नवे भ्रमणमार्गवाघ नवे भ्रमणमार्ग शोधत असल्याने अलीकडे जंगल नसलेल्या परिसरातही ते आढळायला लागल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरलगतच्या बुटीबोरी परिसरात व लगतच्या पाच-सहा गावांच्या शेतशिवारात दोन महिन्यांपूर्वी वाघ आढळला होता. सुमारे महिनाभरापूर्वी माजरी (चंद्रपूर) जवळ असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पडलेल्या वाघाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला होता. हा परिसर जंगलापासून बराच लांब आहे. दोन वर्षापूर्वी भद्रावती तालुक्यातील नंदोरी (जि. चंद्रपूर) येथील शेतशिवारात आलेल्या वाघाने एका युवकाला जखमी के ले होते. हे शेतशिवारही जंगलाजवळ नाही. अशा नव्या परिसरात वाघ दिसायला लागल्याने वनसीमा ओलांडून वाघ आता शेतशिवारातून प्रवासाला निघत असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.वाघांना शेतशिवारातून चालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. हजारो हेक्टर वनजमिनी अतिक्रमणात वाटप होऊनही माणसांची जंगलावरील अतिक्रमाणाची भूक संपलेली नाही. त्याचा परिणाम अशा घटनांमधून दिसत आहे.अशोक खुणे, सेवानिवृत्त डीएफओ, नवेगाव बांध

टॅग्स :Tigerवाघforestजंगल