शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

वाघांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग धोक्यात : नवीन अधिवासाच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 21:02 IST

विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत.

ठळक मुद्देवनसीमा ओलांडून वाघ शेतशिवारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील जंगलांमध्येवाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. भंडारा जिल्ह्यातील बपेरा येथील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे अशाप्रकारची शक्यता आता वन्यजीव अभ्यासक व्यक्त करीत आहेत.तीन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील बिनाखी या गावालगतच्या शेतशिवारात आलेल्या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी झाले. प्रत्यक्षात या गावाला लागून जंगल नाही. त्यामुळे या गावच्या शेतशिवारात वाघ येईल, याची सूतराम कल्पना कुणालाच नव्हती. मात्र शेतशिवारावर वाघ आल्याचे कळल्यावर गावकऱ्यांंनी गर्दी केली. वाघाला हुसकावून लावण्यासाठी काठ्या, दगडधोंडे फेकून मारले. त्यामुळे बिथरलेल्या वाघाने गर्दीवर हल्ला केला.हे गाव मात्र पूर्वेला असलेल्या न्यू नागझिरा वाईल्डलाईफ सेंच्युरी आणि पश्चिमेला असलेल्या पेंच नॅशनल पार्क या दोन जंगलांच्या मध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. या भागातील वाघांचे नैसर्गिक कॉरिडॉर (भ्रमणमार्ग) जवळपास नष्ट झालेले आहेत. पेंच आणि न्यू नागझिरामध्ये वाघांची संख्या बºयापैकी आहे. भंडारा विभागात मागील वर्षी सात वाघांची नोंद झाली आहे. वाढलेले नर वाघ आपला नवा अधिवास शोधण्यासाठी बाहेर पडतात. दोन जंगलांना लागून असलेल्या झाडीतून मार्ग काढत वाघ आपल्या पुढच्या नियोजित जंगलात पोहचतात. मात्र जंगलांना जोडणाºया वृक्षांची आणि झाडांची तोड झाल्याने वाघांचे भ्रमणमार्ग बाधित झाले आहेत. परिणामत: वाघांना मार्ग शोधण्यासाठी शेतशिवारांचा वापर करावा लागत आहे.वाघ शोधताहेत नवे भ्रमणमार्गवाघ नवे भ्रमणमार्ग शोधत असल्याने अलीकडे जंगल नसलेल्या परिसरातही ते आढळायला लागल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरलगतच्या बुटीबोरी परिसरात व लगतच्या पाच-सहा गावांच्या शेतशिवारात दोन महिन्यांपूर्वी वाघ आढळला होता. सुमारे महिनाभरापूर्वी माजरी (चंद्रपूर) जवळ असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पडलेल्या वाघाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला होता. हा परिसर जंगलापासून बराच लांब आहे. दोन वर्षापूर्वी भद्रावती तालुक्यातील नंदोरी (जि. चंद्रपूर) येथील शेतशिवारात आलेल्या वाघाने एका युवकाला जखमी के ले होते. हे शेतशिवारही जंगलाजवळ नाही. अशा नव्या परिसरात वाघ दिसायला लागल्याने वनसीमा ओलांडून वाघ आता शेतशिवारातून प्रवासाला निघत असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.वाघांना शेतशिवारातून चालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. हजारो हेक्टर वनजमिनी अतिक्रमणात वाटप होऊनही माणसांची जंगलावरील अतिक्रमाणाची भूक संपलेली नाही. त्याचा परिणाम अशा घटनांमधून दिसत आहे.अशोक खुणे, सेवानिवृत्त डीएफओ, नवेगाव बांध

टॅग्स :Tigerवाघforestजंगल