शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाघ नागझिरात घटले, ताडोबात वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 04:55 IST

एफडीसीएमच्या नियोजनात निसर्गवन तुटले : सुरक्षित आश्रयस्थानांचा विचार नाही

गोपालकृष्ण मांडवकरनागपूर : निसर्गवन, जैवविविधता आणि पाणी हे जंगलाचे वैभव असते. त्याशिवाय प्राणी स्थिरावत नाही. नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत होत नाही. वाघांसारख्या प्राण्यांसाठी बांबूवन आणि गवताळ प्रदेशाचीही गरज असते. मात्र, अलिकडे वन विकास महामंडळाकडून (एफडीसीम) जंगलात सागांचे एकसुरी रोपण होत असल्याने वाघ टिकत नाहीत. असा अनुभव नागझिरा आणि ताडोबाच्या जंगलाच्या तुलनात्मक अभ्यासातून पुढे आला आहे.सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८० च्या सुमारास नागझिराच्या जंगलात ६ ते ८ वाघ होते. एवढेच वाघ ताडोबाच्याही जंगलात होते. मात्र, या काळामध्ये ताडोबातील वाघ वाढून आता १०० वर पोहोचले, परंतु नागझिरामध्ये असलेल्या वाघांची संख्या ६ ते १० च्या वर गेलेली नाही.ताडोबाचे जंगल वाघांसाठी नेहमीच आदर्श राहिले आहे. गवताळ प्रदेश, बांबू, निसर्गवन हे वातावरण तिथे पोषक आहे.प्रत्यक्षात ताडोबाचे क्षेत्रफळ फारच कमी म्हणजे ११६ चौरस किलेमीटर आहे. यानुसार येथे १२ ते १८ वाघ सामावण्याची क्षमता असली तरी अंधारी प्रकल्पामुळे ती वाढली. यासोबतच अनेक बफर या वनाशी जोडले गेले. त्यामुळे वाघांचा सुरक्षित अधिवास वाढला.नागझिरा हा इंद्रावती-कान्हाचा दुवानवेगाव, नागझिराचे जंगल हे इंद्रावती आणि कान्हा या वनक्षेत्राला जोडणारे महत्त्वाचे कॉरिडोर आहे. हा वाघांचा भ्रमणमार्ग असला तरी वाघ मात्र येथे स्थिरावत नाही. अलिकडे वाढलेल्या वाघांच्या अपघाती मृत्यूच्या घटनाही गंभीर बाब ठरत आहे. नागझिरालगत असणाऱ्या चहुबाजूंच्या शेतींचे रक्षण करण्यासाठी विजेचे सापळे मोठ्या प्रमाणावर लावले जात असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. हा देखील महत्त्वाचा धोका मानला जात असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर