शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नव्या क्षेत्रात पोहचताहेत वाघ, आता प्रतीक्षा व्याघ्र नियोजनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 07:00 IST

चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून वनविभागाच्या नकाशावर जगापुढे येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक ल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे.

ठळक मुद्देवनव्यवस्थापनासोबत सुरक्षाही गरजेचीअधिवासासाठी हवी जीवनसाखळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील वाघांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येपुढे जंगल अपुरे पडत असल्याने नवे वाघ नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. अशा नव्या क्षेत्रात राहू पहाणाऱ्या वाघांसाठी नियोजन मात्र कमी पडत आहे. त्यामुळे वाघ पोहचले पण वनविभाग पोहचला नाही, अशी स्थिती पूर्व विदर्भातील काही भागामध्ये दिसत आहे.चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून वनविभागाच्या नकाशावर जगापुढे येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक ल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे. परिणामत: या क्षेत्रातून स्थलांतरित झालेल्या वाघांची संख्या ब्रह्मपुरी डिव्हीजनमध्ये वाढली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेस असणाऱ्या वडसा डिव्हीजनमध्ये यासाठी बराच वाव आहे. वाघांनी या वन विभागात अधिवास शोधायला सुरुवात केली आहे. हा बदल लक्षात घेऊन वनविभागाकडून संसाधनांसह निधीसारख्या नियोजनाची अपेक्षा आहे. या क्षेत्रात वाघांची संख्या वाढायला लागल्याने मानववन्यजीव संघर्षासोबतच वाघांमध्येही संघर्ष व्हायला लागला आहे. चितेगाव वन परिक्षेत्रामध्ये झालेली वाघांची झुंज हे त्याचेच उदाहरण मानले जात आहे. यातूनच वाघ पकडण्याची मागणीही वाढायला लागली आहे.वन विभागाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, प्राणहिता आणि चपराळा अभयारण्य जाहीर केले आहे तर महाराष्टÑ, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील कोलमार्का हे रानम्हशींसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे. नव्या अधिवासांच्या शोधात निघालेल्या वाघांसाठी हे संरक्षित क्षेत्र असले तरी अद्याप बºयाच तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नाही. म्हणूनच नव्या क्षेत्रात वाघ पोहचत असतानाही वन विभाग पोहचला नाही, असे चित्र पुढे येत आहे. अन्नसाखळी मजबूत करणे हे यातील महत्त्वाचे आवाहन आहे.कायद्यासोबतच हवे प्रत्यक्ष संरक्षणभामरागड आणि प्राणहिता या अभयारण्यामध्ये वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. भूप्रदेश, नक्षलवादी कारवाया, आदिवासींचे जनजीवन या बाबी लक्षात घेता कायद्याच्या संरक्षणासोबतच वन्यजीवांना प्रत्यक्ष संरक्षण पुरविताना वन विभागाचा येथे कस लागणार आहे. चपराळा अभयारण्य जाहीर होऊन बरीच वर्षे लोटली. तरी अद्यापही वन विभागाकडून येथे म्हणावे तसे चित्र दिसत नाही. यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन नियोजन आखण्याचीही गरज आहे.नव्या क्षेत्रात वाघ स्थिरावणे ही आनंदाची बाब आहे. मात्र वाघांचा नवा अधिवास लक्षात घेऊन वन विभागाने तृणभक्षी प्राण्यांसोबत वन व्यवस्थापनाकरिता आवश्यक निधी व संसाधनांची पूर्तता करण्याची अपेक्षा आहे. वाघांचे कृत्रिम स्थलांतरण करताना नैसर्गिक स्थलांतरणात येणाºया अडचणी देखील ओळखाव्या._ बंडू धोत्रे, सदस्य, राज्य वन्यजीव समिती

 

टॅग्स :Tigerवाघ