शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 05:25 IST

विधानसभेत आ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, जयंत पाटील, सुनील प्रभू, काशिनाथ दाते, कृष्णा खोपडे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडत राज्यात वाघ, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याकडे वनमंत्र्यांचे लक्ष वेधले.

नागपूर : राज्यात वाघ व बिबटे मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वाढल्या असून त्यांच्या हल्ल्यात अनेकांचे जीव जात आहेत. तर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांना वस्त्यांमध्ये फिरणे कठीण झाले आहे. मंगळवारी विधानसभेत हा मुद्दा चांगलाच गाजला. सर्वपक्षीय आमदारांनी याकडे शासनाचे लक्ष वेधत उपाय योजण्याची मागणी लावून धरली. शेवटी या संवेदनशील विषयावर ठोस उपाय योजण्यासाठी अधिवेशन काळात मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला.

बिबट्या आता वन्यजीव नव्हे, उसातील प्राणी

विधानसभेत आ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, जयंत पाटील, सुनील प्रभू, काशिनाथ दाते, कृष्णा खोपडे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडत राज्यात वाघ, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याकडे वनमंत्र्यांचे लक्ष वेधले.

या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, बिबट्या आता नुसता वन्यजीव राहिला नाही, तर तो उसातील प्राणी झाला आहे. त्यामुळे शेड्युल १ मध्ये असलेल्या बिबट्याचा समावेश आता शेड्युल २ मध्ये करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

सन २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ६७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३१ जणांचा मृत्यू गेल्या ११ महिन्यांत झाला आहे.

जंगलात बकऱ्या सोडणार, फळझाडे लावणार

जंगलात शाकाहारी प्राण्यांना खाण्यासाठी फळे उरलेली नाही. त्यामुळे शाकाहारी प्राणी शहराकडे येतात व त्यांच्या शोधात वाघ, बिबट जंगलाबाहेर येतात. त्यामुळे जंगलाच्या कोअर भागात फळझाडे लावली जातील.

शाकाहारी प्राणी जंगलातच राहतील व बिबटे त्यांच्या शोधात बाहेर येणार नाहीत. वन्यप्राण्यांसाठी खाद्य म्हणून जंगलात बकऱ्या सोडल्या जातील, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी सहाही विभागातील लोकप्रतिनिधी, वनमंत्री व महसूलमंत्री याची विभागनिहाय बैठक घेऊन या प्रश्नावर उपाय योजण्यात येईल, असे आश्वस्त केले.

बऱ्याच शेतकऱ्यांकडे बंदूक परवाने होते. वन्यप्राण्यांपासून बचावासाठी या शस्त्रांचा उपयोग केला जायचा. मात्र, त्यांचे परवाने नूतनीकरण करण्यात आलेले नाहीत. रत्नागिरीहून अशी तक्रार आली असता तेथील जिल्ह्याधिकाऱ्यांना बंदूक परवाने नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागांतही महसूलमंत्र्यांच्या माध्यमातून तशा सूचना दिल्या जातील, असेही वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

आमदाराला कुत्रा चावला तर काय करायचे?

मुंबईत सुमारे एक लाखांच्या आसपास भटकी कुत्री आहेत. या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता तर लोकप्रतिनिधींनाही वस्त्यांमध्ये फिरणे कठीण झाले आहे, असे सांगत या भटक्या कुत्र्यांना आवरा, अशी मागणी मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी केली.

भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी मांडत मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी फक्त ८ निवारा केंद्र असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. तर, आमदाराला कुत्रा चावल्यास काय करायचे, असा सवाल आ. सुनील प्रभू यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Wild animal attacks, stray dogs menace debated in Maharashtra Assembly.

Web Summary : Maharashtra Assembly discussed rising wild animal attacks and stray dog menace. The government will hold a meeting with ministers and officials to find solutions, focusing on preventing animal-human conflict.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनleopardबिबट्या