शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तिकीट कन्फर्म नाही, मग दंड भरा अन् खाली उतरा; इंग्रजकालीन नियमाची स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 04:47 IST

लांबचा प्रवास म्हटला की, सर्वप्रथम रेल्वेच नजरेसमोर येते. कारण प्रवासात इतर सुविधा तर असतातच मात्र तिकीट कन्फर्म असेल तर बर्थवर झोपूनही जाता येते.

नागपूर : वेटिंग तिकीट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसायचे. पुढे टीसीला दंडाची रक्कम देऊन प्रवास सुरळीत करून घ्यायचा, हा प्रकार आता चालणार नाही. टीसी दंडाची रक्कम वसूल करेलच; मात्र लगेच तुम्हाला त्या डब्यातून खालीदेखील उतरवून देईल. होय, इंग्रजांच्या काळातील या नियमाची आता स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी सुरू झाली आहे.

लांबचा प्रवास म्हटला की, सर्वप्रथम रेल्वेच नजरेसमोर येते. कारण प्रवासात इतर सुविधा तर असतातच मात्र तिकीट कन्फर्म असेल तर बर्थवर झोपूनही जाता येते. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेचे तिकीट काढतात. मात्र, अनेकांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे अनेक जण वेटिंग तिकीट घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करतात. गेल्या जून महिन्यापर्यंत वेटिंगचे तिकीट जवळ घेऊन प्रवासी आरक्षित कोचमध्ये चढून प्रवास करायचे. तिकीट तपासणीस जवळ आल्यास तो ते तिकीट पाहून संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम घेऊन पावती हातात ठेवायचा आणि निघून जायचा. दंड भरल्यामुळे संबंधित प्रवासी पुढचा प्रवास त्याच कोचमधून करीत होता. मात्र आता दंड भरल्यावरदेखील संबंधित प्रवासी त्या कोचमधून प्रवास करू शकणार नाही. कारण अशा प्रवाशांबाबत ओरड, तक्रारी वाढल्याने रेल्वेने आता वेटिंग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करण्यासंदर्भात मोठे बदल केले आहेत. त्यानुसार, वेटिंग तिकिटावर रेल्वे प्रवास केल्यास टीसी संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम वसूल करेल. एवढेच नव्हे तर दंड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला पुढच्या स्थानकावर त्या डब्यातून उतरवून सुद्धा देणार आहे.

... तर तिकीट रद्द करून रक्कम परत घ्या !

काउंटरवर जाऊन तुम्ही तिकीट काढले असेल आणि ते प्रवासाच्या वेळेपर्यंत कन्फर्म झाले नसेल तर तिकीट रद्द करून प्रवासी आपले पैसे परत घेऊ शकतात.

असे न करता त्या तिकिटावर प्रवास केल्यास तिकीट कन्फर्म होणार नाही. नाहक दंडाचीही रक्कम भरावी लागणार आहे.

 

 

टॅग्स :railwayरेल्वे