शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांत तीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: June 5, 2015 02:37 IST

मनोज मालवीय डेव्हलपमेंट सेंटरच्या (एमएमडीसी) माहितीनुसार मागील २० वर्षांत देशातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नागपूर : मनोज मालवीय डेव्हलपमेंट सेंटरच्या (एमएमडीसी) माहितीनुसार मागील २० वर्षांत देशातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील ७२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. एमएमडीसी सेंटरने शेतकऱ्यांच्या या आत्महत्या रोखण्यासाठी एक प्रोजेक्ट तयार केला आहे. शिवाय तो देशभरात लागू करण्याची केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. ‘आम्ही सर्व शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने बनणार करोडपती’ असे या प्रोजेक्टचे नाव असून, त्याचा गुरुवारी संविधान चौकात शुभारंभ करण्यात आला. या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत केले जाणार आहे. शिवाय त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल. संस्थेचे प्रमुख मनोज मालवीय यांच्या मते, प्रत्येक वर्षी देशातील १५ हजारापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात. मागील १९९५ ते २०१५ पर्यंत तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एनएसएसओ-२०१४ च्या अहवालानुसार शेतीतून शेतकऱ्याच्या कुटुंबाला केवळ ३ हजार १०० रुपयांचे उत्पन्न मिळत असून, महागाईच्या तुलनेत ते फार कमी आहे. मागील काही वर्षांत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात १२० पटीने वाढ केली आहे. तसेच शिक्षकांच्या पगारात ३२० पटीने वाढ झाली असून कार्पोरेट क्षेत्रातील लोकांचा पगार सात पटीने वाढला आहे. या उलट शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीत केवळ १९ पटीने वाढ झाली आहे. १९७० मध्ये गव्हाचे किमान आधारभूत मूल्य ७६ रुपये प्रति क्विंटल होते, ते आज केवळ १४५० रू पयापर्यंत पोहोचले आहे. ही तफावत दूर करण्यासाठी संस्थेतर्फे प्रोजेक्टमध्ये काही सूचना केल्या असल्याचे यावेळी मालवीय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)