शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 21:15 IST

मातीच्या अवैध खोदकामासाठी गेलेले कामाच्या ठिकाणी आरात करीत बसले असतानाच सुळका कोसळला. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने तीन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) येथील एमआयडीसी भागात शुक्रवारी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील कन्हान एमआयडीसी परिसरातील दुर्दैवी घटनाअवैध खोदकाम कारणीभूत : आराम करीत असताना कोसळला सुळका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कन्हान) : मातीच्या अवैध खोदकामासाठी गेलेले कामाच्या ठिकाणी आरात करीत बसले असतानाच सुळका कोसळला. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने तीन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) येथील एमआयडीसी भागात शुक्रवारी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्याने तणाव निवळला. 

मृतांमध्ये शिवकुमार नागमन मनहने (४०), गंगाप्रसाद रघू जलघरे (४५) व कन्हैयालाल रामकेवल चंदन (२५) तिघेही रा. फुकटनगर, कन्हान, ता. पारशिवनी या तिघांचा समावेश आहे. कन्हान शहरालगत असलेल्या एमआयडीसीच्या जागेवर काही वर्षापासून मातीचे अवैध खोदकाम केले आहे. या तिघांसह सुरेश दखन कनोजिया (२२, रा. फुकटनगर, कन्हान, ता. पारशिवनी) हा माती खोदकामासाठी गेला होता. या चौघांनीही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत माती भरली. त्यानंतर तिघेही खोदकाम केलेल्या जागेवर सुळक्याच्या खाली आराम करण्यासाठी बसले.दरम्यान, सुळका कोसळला आणि तिघेही मातीच्या ढिगाऱ्यात दबल्या गेले. माहिती मिळताच जिल्हा परिषसदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, वेकोलिच्या एचएमएस कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांच्यासह वेकोलिचे अधिकारी, पोलीस व नागरिक घटनास्थळी दाखल झाले. वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने तिघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले. तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. त्याचवेळी नागरिकांनी नुकसानभरपाईची मागणी रेटून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शरद डोणेकर व शिवकुमार यादव यांनी मध्यस्थी केल्याने वेकोलि प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे तणाव निवळला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी सुरेश कनोजिया याच्या तक्रारीवरून अकसमात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.जीवघेणे अवैध धंदेकन्हान परिसरात चोरी व अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गोंडेगाव येथील कोळसा खाण बंद करण्यात आली असून, त्या परिसरातून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरून नेला जातो. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी रितेश भीमराव चवरे (२५, रा. रमानगर, कामठी) व सतीश केशवराव देशमुख (३५, रा. बीबीनगर, कॉलनी, कामठी) हे कोळसा चोरून नेत असताना मोठा दगड कोसळला. त्याखाली दबून दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चोरी व अवैध धंदे जीवघेणे ठरत असले तरीही ते करण्याची हिंमत केली जात आहे.प्रशासनाचा कानाडोळाया भागात काही वर्षांपासून मातीचे अवैध खोदकाम केले जात आहे. ती जागा एमआयडीसीच्या अखत्यारीत येत असली तरी तिथे कोणतेही छोटेमोठे उद्योग नसल्याने ती ओसाड आहे. चोरट्यांनी त्या जागेवरील माती खोदून न्यायला सुरुवात केली. या खोदकामात तिथे मातीचे सुळके तयार झाले. दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाली. त्यामुळे सैल झालेला सुळका कोसळला आणि तिघांना त्यांचे प्राण गमवावे लागले. ही मातीचोरी प्रशासनाला माहिती असूनही कुठलीही उपाययोजना केली जात नाही.या ठिकाणी मातीचे अवैध खोदकाम केले जाते. मध्यंतरी रेतीसोबतच येथील माती चोरट्यांवर कारवाई करून त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला होता. चोरटे येथे रात्रभर मातीचे खोदकाम करतात. या भागात रेतीचोरीचे प्रमाण अधिक असल्याने माती चोरट्यांवर कारवाई करणे कठीण जाते. या घटनेतील माती चोरट्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. वरूणकुमार सहारे,तहसीलदार, पारशिवनी.

टॅग्स :Excavationउत्खननDeathमृत्यू