शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विदर्भातील तीन बाइकर्स निघाले तवांगच्या प्रवासाला; राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2022 17:00 IST

तीन मित्रांची अशीही जिद्द : लेह-लडाख, भूतान, नेपाळचा पाचवा टूर

नागपूर : मनात जिद्द घेऊन विदर्भातील तीन बाइकर्स यंदा पुन्हा पाचव्यांदा प्रवासाला निघाले आहेत. थंडी, वारा अंगावर झेलत दरवर्षी नव्या प्रदेशाच्या शोधात निघणाऱ्या या तिघांचा २० दिवसांचा ५,४०० किलोमीटरचा प्रवास रविवारी नागपुरातून सकाळी सुरू झाला आहे.

प्रशांत कावडे, सतीश मसराम आणि सचिन रामटेके अशी या साहसी युवकांची नावे आहेत. प्रशांत हे नागपूरचे असून, खासगी ट्युशन क्लासेस घेतात. सतीश अमरावतीचे असून, एलआयसी अभिकर्ता म्हणून काम करतात, तर सचिन निवृत्त आर्मी जवान असून गडचिरोलीला राहतात. ४० ते ४५ वर्षे वय असलेल्या या तीन मित्रांनी २०१७ पासून बाइकने भ्रमण करण्याची कल्पना अंमलात आणली. सकाळी रेशिमबाम चौकातून प्रशांत कावडे, सतीश मसराम यांनी प्रवासाला प्रारंभ केला, तर सचिन रामटेके राजनगाव-रायपूर दरम्यान मार्गात या प्रवासात सामील झाले. या २० दिवसांच्या प्रवासात बिलासपूर, गया (बिहार), सिलीगुडी (प. पंगाल), नाथूला पास (सिक्कीम : भारत-चीन सीमा), गंगटोक, तेजपूर (अरुणाचल प्रदेश) आणि तवांग सेलपास (अरुणाचल प्रदेश) या ठिकाणी ते जाणार आहेत. परवानगी मिळाल्यास सेलपासच्या पुढेही जाण्याचा त्यांचा मानस आहे.

आपल्या या साहसी मोहिमेबद्दल ‘लोकमत’शी बोलताना प्रशांत कावडे म्हणाले, २०१७ मध्ये मित्रांच्या डोक्यात ही कल्पना आली. लेह-लडाखला जाण्याचे ठरले. त्यानुसार १० जून २०१७ ला २१ दिवसांचा पहिला सुरू प्रवास केला. २०१८ मध्ये प्रवासाचा दुसरा टप्पा भुतानचा पार पाडला. नंतर २०१९ मध्ये ४,२०० किलोमीटरचा नेपाळ प्रवास केला. २०२० मध्ये कोरोनामुळे जाता आले नाही. २०२१ मध्ये स्प्रिटी व्हॅली-लद्दाखचा प्रवास पूर्ण केला. आता ही पाचवी राइड्स आहे.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार

स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मार्गातील देशवासीयांना राष्ट्रीय एकात्मतेचा आणि देशभक्तीचा संदेश आपण देणार असल्याने प्रशांत कावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आपल्या दुचाकीवर वाऱ्यासोबत फडकणारा देशाचा राष्ट्रध्वज आपणास प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. हा प्रवास खडतर असला तरी स्वप्नपूर्तीचा आनंद देणारा आहे. त्यातून युवकांना प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SocialसामाजिकVidarbhaविदर्भ