शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही : सीताराम येचुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 13:29 IST

भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देमार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राज्य अधिवेशन

नागपूर : केवळ १० व्यक्तींच्या हाती देशातील ५७ टक्के संपत्ती आहे. गरीब गरीबच होत चालले असून, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. त्यामुळे मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.

भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) २३ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पाडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष विजय जावंधिया, माकपाचे पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू, केंद्रीय कमिटीचे सदस्य अशोक ढवळे, मरियम ढवळे, जीवा पांडू गावित, माकपाचे राज्य सचिव आमदार नरसय्या आडम, अनिल ढोकपांडे उपस्थित होते.

सीताराम येचुरी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हिंदुत्ववादी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपशासित राज्यात दलित, आदिवासी, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बँक, एलआयसी, रेल्वेचे खासगीकरण करण्यात येत आहे. देशाच्या संपत्तीची लूट होत आहे. याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांवर हल्ले वाढत असून, देशद्रोही ठरविण्यात येत आहे. भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले.

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष विजय जावंधिया म्हणाले, शहरांचा विकास होत असताना खेडी गरीब होत आहेत, ही शोकांतिका आहे. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्या, परंतु त्यासोबतच शेतमजुरी वाढण्याची गरज आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत निलोत्पल वसू यांनी व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाचे एस. व्ही. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन अरुण लाटकर यांनी केले. आभार उदय नारकर यांनी मानले. अधिवेशनाला माकपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर