शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही : सीताराम येचुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 13:29 IST

भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देमार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राज्य अधिवेशन

नागपूर : केवळ १० व्यक्तींच्या हाती देशातील ५७ टक्के संपत्ती आहे. गरीब गरीबच होत चालले असून, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. त्यामुळे मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.

भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) २३ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पाडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष विजय जावंधिया, माकपाचे पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू, केंद्रीय कमिटीचे सदस्य अशोक ढवळे, मरियम ढवळे, जीवा पांडू गावित, माकपाचे राज्य सचिव आमदार नरसय्या आडम, अनिल ढोकपांडे उपस्थित होते.

सीताराम येचुरी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हिंदुत्ववादी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपशासित राज्यात दलित, आदिवासी, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बँक, एलआयसी, रेल्वेचे खासगीकरण करण्यात येत आहे. देशाच्या संपत्तीची लूट होत आहे. याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांवर हल्ले वाढत असून, देशद्रोही ठरविण्यात येत आहे. भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले.

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष विजय जावंधिया म्हणाले, शहरांचा विकास होत असताना खेडी गरीब होत आहेत, ही शोकांतिका आहे. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्या, परंतु त्यासोबतच शेतमजुरी वाढण्याची गरज आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत निलोत्पल वसू यांनी व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाचे एस. व्ही. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन अरुण लाटकर यांनी केले. आभार उदय नारकर यांनी मानले. अधिवेशनाला माकपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर