शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात

By admin | Updated: November 30, 2015 02:37 IST

अधिग्रहण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे राज्यातील सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात आहेत.

अधिग्रहणाची दिरंगाई भोवतेय : शासनाने वेळीच सावध होणे आवश्यकराकेश घानोडे  नागपूर अधिग्रहण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे राज्यातील सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यानुसार आतापर्यंत अनेक सार्वजनिक जमिनींचे आरक्षण रद्द झाले असून अनेक जमिनींचे आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी शासनाने वेळीच सावध होऊन अधिग्रहणाची कारवाई तातडीने पूर्ण करणे आवश्यक झाले आहे.महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा-१९६६ मधील कलम १२७ अनुसार सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित जमिनीचे अंतिम विकास आराखडा अंमलात आल्यापासून १० वर्षांच्या आत अधिग्रहण करणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण रद्द होते. परंतु, जमीन मालकाला मोबदला देण्यासाठी निधी मिळाला नसल्याने किंवा निधी मिळूनही संबंधित रक्कम मूळ मालकाला मोबदला न देता दुसऱ्याच कामासाठी उपयोगात आणल्यामुळे राज्यात सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित अनेक जमिनींचे अधिग्रहणच करण्यात आलेले नाही. यामुळे अंतिम विकास आराखडा अंमलात आल्यापासून १० वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर जमीन मालक आरक्षण रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करीत आहेत. आतापर्यंत अनेक जमीन मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून दिलासा मिळविला आहे. तसेच, पुन्हा अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. काय म्हणते कलम १२७महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यांतर्गत कोणत्याही उद्देशासाठी आरक्षित, वितरित किंवा निश्चित केलेली जमीन अंतिम प्रादेशिक आराखडा किंवा अंतिम विकास आराखडा अंमलात आल्यापासून १० वर्षांच्या आत करार करून अधिग्रहित केली नाही किंवा या कालावधीत नगररचना कायदा किंवा जमीन अधिग्रहण कायदा-१८९४ अंतर्गत अधिग्रहणाची कार्यवाही सुरू झाली नाही, तर मालक किंवा जमिनीत रुची ठेवणारी व्यक्ती संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात नोटीस पाठवू शकते. यानंतर नोटीस मिळाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही किंवा अधिग्रहणासाठी कोणतीही पावले उचलवण्यात आली नाहीत तर जमिनीचे आरक्षण किंवा वाटप रद्द झाले असे गृहित धरले जाईल. ही जमीन संबंधित मालकाला विकासाकरिता उपलब्ध करून दिली जाईल.हायकोर्टाने घेतली दखल आरक्षण रद्द करण्यासाठी आतापर्यंत अनेक जमीन मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे सार्वजनिक भूखंडांचे आरक्षण रद्द होत आहे ही बाब गंभीरतेने घेऊन न्यायालयाने याविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. शासनाने गेल्यावर्षीपासून याविषयी न्यायालयात भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे न्यायालयाने शासनाला उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून येत्या १० डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित जमिनीचे आरक्षण रद्द होऊ नये यासाठी काय कारवाई करण्यात आली आहे किंवा काय कारवाई करणे प्रस्तावित आहे आणि सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित जमिनीचा मोबदला देण्यासाकरिता पुरेसा निधी मिळाल्यानंतरही संबंधित रकमेतून मोबदला न देता ही रक्कम दुसऱ्याच कामासाठी उपयोगात आणली जात आहे काय अशी विचारणा न्यायालयाने शासनास केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘गिरनार ट्रेडर्स वि. महाराष्ट्र शासन’ प्रकरणामध्ये निर्णय देताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्याच्या कलम १२७ अंतर्गत नोटीस मिळाल्यानंतरही अधिग्रहणासाठी काहीच पावले उचलण्यात आली नाहीत तर जमीन आरक्षणमुक्त समजण्यात यावी, असा खुलासा केलेला आहे.