शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

७० वर्षात देशातील हजाराे उपनद्या नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

नागपूर : जगभरात सर्वत्र मानवी वसाहती आणि मानवी संस्कृती रुजली ती नद्यांच्या काठावरच. मानवाच्या अस्तित्वाला स्थायी रूप देणाऱ्या नद्या ...

नागपूर : जगभरात सर्वत्र मानवी वसाहती आणि मानवी संस्कृती रुजली ती नद्यांच्या काठावरच. मानवाच्या अस्तित्वाला स्थायी रूप देणाऱ्या नद्या मात्र मानवी हव्यासाच्या बळी ठरल्या आहेत. आपल्या देशात गेल्या ७० वर्षात हजाराे लहान नद्या व उपनद्या जवळजवळ लुप्तप्राय झाल्या आहेत. बारमाही असणाऱ्या ७० टक्के नद्या आता हंगामी झाल्या आहेत. अत्याधिक, अमर्याद जलउपसा, रेती उपसा आणि प्रदूषणाने नद्यांचे अस्तित्व संकटात लाेटले आहे.

‘विकास’ हा शब्द आता पर्यावरणासाठी मारक ठरला आहे. विकासाच्या नावावर बहुतेक नैसर्गिक घटक संकटात आले असून भविष्यात मानवाला याचे परिणाम भाेगावे लागणार आहेत. पर्यावरण व नदी वैज्ञानिक प्रा. व्यंकटेशन दत्ता यांनी त्यांच्या अभ्यासपेपरमधून देशभरातील नद्यांचे धक्कादायक वास्तव मांडले आहे. ४०-५० वर्षांपूर्वी देशभरातील बहुतेक नद्या या बारमाही हाेत्या. आता मात्र त्यांचा प्रवाह केवळ पावसाळ्यात वाहताना दिसताे. देशातील ७० टक्के नद्या हंगामी झाल्या आहेत आणि जगभरात हेच चित्र आहे. भारताच्या संदर्भाने हे भविष्यातील माेठ्या संकटाचे संकेत असल्याचे प्रा. दत्ता यांनी व्यक्त केले.

- नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहापेक्षा त्यातून पाण्याचा उपसा केला जात आहे.

- धरणे बांधून पाण्याचा प्रवाह राेखला व कालवे काढून पाण्याचे अत्याधिक शाेषण केले. नद्यांपेक्षा कालव्यांची लांबी माेठी झाली आहे. जगात सर्वाधिक ७४ हजार किलाेमीटर लांबीचे कालवे उत्तर प्रदेशात आहेत. कालव्यातून बाराही महिने पाणी वाहावे म्हणून नद्यांचे शाेषण केले जात आहे.

- माेठ्या प्रमाणात हाेणारा भूजल उपसा हेही नद्या सुकण्याचे प्रमुख कारण आहे. ५० वर्षात भूजल खाली गेले आणि रिव्हर बेड वर आले आहेत.

- प्रदूषण हे तर नद्यांची हत्या करण्यामागचे सर्वश्रुत कारण ठरले आहे.

महाराष्ट्रातील ५३ नद्या अतिप्रदूषणाच्या विळख्यात

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील ३५१ नद्या अतिप्रदूषणाच्या विळख्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील ५३ नद्या आहेत. मुंबईची उल्हास आणि मिठी नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. विदर्भातील वैनगंगा व वर्धा नदीचाही या यादीत समावेश आहे. वैनगंगेचा तुमसर ते आष्टीपर्यंतचा ७०७ किमीचा पट्टा प्रदूषणाच्या विखळ्यात आहे. कन्हान नदीचा नागपूर ते भंडारा हा १०० किमीचा विस्तार अति प्रदूषणाच्या श्रेणीत आहे.

अमर्याद रेती उपशातून नद्यांची हत्या

बांधकामासाठी वाळूला पर्याय नाही. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपशातून नद्यांची हत्या केली जात आहे. देशात वर्षाला ७० दशलक्ष टन वाळूचा उपसा हाेताे व यामध्ये दरवर्षी ७ टक्क्यांनी वाढ हाेत आहे. ‘वर्ल्डवाईड फंड फाॅर नेचर’च्या रिपाेर्टनुसार जगात दरवर्षी ५० अब्ज मेट्रिक टनाचा उपसा नद्यांमधून हाेताे. वाळू उपसा हा सर्वात माेठा व्यवसाय झाला असून यामध्ये माेठ्या अधिकाऱ्यांच्या हत्या करायला मागेपुढे पाहिले जात नाही. जानेवारी २०१९ ते नाेव्हेंबर २०२० या काळात १९३ लाेकांच्या हत्या करण्यात आल्या. अमर्याद वाळू उपशामुळे नद्यांचा प्रवाह बिघडला आणि वारंवार पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली. वाळूमध्ये अंडी देणाऱ्या मासे, झिंगे, कासव, खेकडे, बेडूक आदी प्राण्यांची जैवविविधता नष्ट झाली आहे. प्रा. दत्ता यांच्या मते वाळूचा पर्याय शाेधणे नितांत गरजेचे झाले आहे.