शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात हजारो टन संत्र्यांची नासधूस; उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 14:35 IST

वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या उभ्या पिकाची नासधूस झाली आहे. झाडांवरून संत्री गळून पडली आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या संत्र्यांची तोड लवकर न झाल्यास, ते गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआधीच ‘कोरोना’चा मार, आता पाऊसही झोंबला

वसीम कुरैशी/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत संत्राउत्पादकांना संत्र्यांचे भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उत्पादक चिंतित होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी आलेले वादळ आणि रात्री बरसलेल्या पावसाने त्या चिंतेला संकटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या उभ्या पिकाची नासधूस झाली आहे. झाडांवरून संत्री गळून पडली आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या संत्र्यांची तोड लवकर न झाल्यास, ते गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.विदर्भातील संत्री उत्पादकांच्या जवळपास ८० टक्के मालाची विक्री झाली आहे, तर २० टक्के संत्री अजूनही झाडांनाच आहेत. लॉकडाऊनमुळे कळमना मार्केटचे कामकाज थांबले आहे. या काळात संत्र्यांना ग्राहक उपलब्ध होणे गरजेचे आहे. या संत्र्यांच्या विक्रीकरिता सरकारकडे सहकार्याची याचना केली जात आहे. विशेष म्हणजे संत्री उत्पादकांकरिता हे वर्ष उत्तम राहिले आहे. शंभर टक्के पीक झाल्याने उत्पादकांमध्ये उत्साह होता. होळीच्या एक आठवड्यानंतरपर्यंत ८० टक्के पीक काढण्यात आले. याच काळात बाजारात संत्री ३० हजार रुपये प्रति टन भावाने विकली जात होती. मिळणारा हा मोबदला उत्तम मानला जात होता. मात्र काही उत्पादकांनी आणखी भाव मिळेल, या आशेने आपला माल रोखून ठेवला होता. मात्र, कोरोनाचा मार पडला आणि अपेक्षांची धुळधाण झाली. त्यावर वादळ आणि पावसाने उरलीसुरली अपेक्षाही धुळीस मिळाल्याची स्थिती आहे.पीक चांगले झाले: विदर्भात जवळपास ९० हजार हेक्टरमध्ये संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी ७ ते ८ लाख टन संत्री उत्पादित केले जातात. यंदा पीक उत्तम झाले. संत्र्यांची तोड फेब्रुवारीपासून सुरू होते आणि मार्चच्या अखेरपर्यंत हे पीक काढले जाते.- एम.एस. लदानिया : संचालक, लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था नागपूरविदर्भाच्या संत्री उत्पादकांसाठी हा काळ अतिशय निराशाजनक आहे. जी संत्री झाडांवरच आहेत, त्यांना मार्केटमध्ये विक्रीची व देशाच्या अन्य शहरात निर्यात करण्यासाठीची कुठलीच व्यवस्था नाही. ही व्यवस्था लवकरात लवकर केली गेली नाही तर उत्पादकांना मोठो नुकसान सोसावे लागेल.- अहमद कादर, सामाजिक कार्यकर्तानागपूरसह अमरावती, पांढुर्णा, सौंसर व सिवनी येथेही संत्री उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. हा माल काश्मीर ते कन्याकुमारी आणि काठमांडूपर्यंत पाठविला जातो. पाऊस आणि वादळाचा मार बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे पीक नाशीवंत असल्याने तात्काळ निर्यातीची व्यवस्था करणे गरजेचे आहे.- राजेश छाबरानी, आडतिया 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती