शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

घातपात रोखण्यासाठी 'रेल्वे ट्रॅक'शेजारी हजारो 'लाईव्ह कॅमेरे!

By नरेश डोंगरे | Updated: September 28, 2024 21:49 IST

समाजकंटकांना आवरण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून उपाययोजना

- नरेश डोंगरे

नागपूर : रेल्वे लाईनवर घातक साहित्य ठेवून रेल्वे गाड्यांना घातपात घडवून आणण्याचे षडयंत्र रचणारे समाजकंटक सध्या रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी ठरले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी रेल्वे लाईनच्या बाजूला हजारो 'लाईव्ह कॅमेरे प्लान्ट' करण्याची योजना आखली आहे. अलिकडे रेल्वेगाड्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात काही दिवसांपासून ठिकठिकाणच्या रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर, डिटोनेटर, मोठमोठे दगड, लोखंडी सळाखी आणि असेच घातक साहित्य आढळले आहे. 

कुठे फिश प्लेटचे नटबोल्ट खिळखिळे झाल्याचे तर कुठे जॉईंटजवळ काड्या केल्याचेही आढळत आहे. रेल्वे गाड्यांना घातपात घडवून आणण्याच्या षडयंत्राचाच हा भाग असल्याचा संशय घेतला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनाही हादरल्या आहेत. रेल्वेचे कर्मचारी 'ट्रॅक पेट्रोलिंग' करून अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्नशिल असले तरी रेल्वेचे विस्तारलेले नेटवर्क बघता प्रत्येक ट्रॅकवर सुरक्षेची यंत्रणा उभारणे आणि प्रत्येक वेळी नजर ठेवणे अशक्य आहे. घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या समाजकंटकांना शोधून काढणेही जिकरीचे काम ठरले आहे. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी 'थर्ड लाईव्ह आय'चा अभिनव उपाय शोधला आहे.

'थर्ड आय'ला अलर्ट करण्याचे प्रयत्नरेल्वे ट्रॅकच्या आजुबाजूला काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे राहतात. मात्र, त्यांची संख्या मर्यादित आहे. उलट ट्रॅकशेजारी राहणारी मंडळी थर्ड आय बणून अपघात रोखण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळे यापुढे रेल्वेचे तसेच सुरक्षा दलाचे कर्मचारी, जवान नियमित नागरिकांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन त्यांना समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि रेल्वे अपघात रोखण्यासाठी अलर्ट करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. गाव-शहरातील नागरिकच नव्हे तर जंगलात गुरे चाणरांची, राखण करणारांनाही अलर्ट मोडवर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.

तात्काळ अॅक्शन मोड'च्या सूचनारेल्वे लाईनच्या आजुबाजुला कुठे, कोणताही संशयीत आढळल्यास तात्काळ अॅक्शन मोडवर या. जवळच्या रेल्वे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान, रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्यापैकी कुणालाही तात्काळ सूचना द्या. देशाचे सजग प्रहरी म्हणून अभिमानाची कामगिरी बजावा, असे नागरिकांना सांगण्यात येत आहे.

जनजागरणाची विशेष मोहिमरेल्वेचा एक अपघात घडला तर शेकडो प्रवाशांच्या जान-मालाला नुकसान पोहचवू शकतो. त्यामुळे समाजकंटकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आणि रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी लोकसहभागच अत्यंत प्रभावी उपाय ठरणार असल्याचे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागरण करून नागरिकांची मदत घेतली जात असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य यांनी लोकमतशी बोलताना म्हटले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे