शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

घातपात रोखण्यासाठी 'रेल्वे ट्रॅक'शेजारी हजारो 'लाईव्ह कॅमेरे!

By नरेश डोंगरे | Updated: September 28, 2024 21:49 IST

समाजकंटकांना आवरण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून उपाययोजना

- नरेश डोंगरे

नागपूर : रेल्वे लाईनवर घातक साहित्य ठेवून रेल्वे गाड्यांना घातपात घडवून आणण्याचे षडयंत्र रचणारे समाजकंटक सध्या रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी ठरले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी रेल्वे लाईनच्या बाजूला हजारो 'लाईव्ह कॅमेरे प्लान्ट' करण्याची योजना आखली आहे. अलिकडे रेल्वेगाड्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात काही दिवसांपासून ठिकठिकाणच्या रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर, डिटोनेटर, मोठमोठे दगड, लोखंडी सळाखी आणि असेच घातक साहित्य आढळले आहे. 

कुठे फिश प्लेटचे नटबोल्ट खिळखिळे झाल्याचे तर कुठे जॉईंटजवळ काड्या केल्याचेही आढळत आहे. रेल्वे गाड्यांना घातपात घडवून आणण्याच्या षडयंत्राचाच हा भाग असल्याचा संशय घेतला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनाही हादरल्या आहेत. रेल्वेचे कर्मचारी 'ट्रॅक पेट्रोलिंग' करून अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्नशिल असले तरी रेल्वेचे विस्तारलेले नेटवर्क बघता प्रत्येक ट्रॅकवर सुरक्षेची यंत्रणा उभारणे आणि प्रत्येक वेळी नजर ठेवणे अशक्य आहे. घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या समाजकंटकांना शोधून काढणेही जिकरीचे काम ठरले आहे. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी 'थर्ड लाईव्ह आय'चा अभिनव उपाय शोधला आहे.

'थर्ड आय'ला अलर्ट करण्याचे प्रयत्नरेल्वे ट्रॅकच्या आजुबाजूला काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे राहतात. मात्र, त्यांची संख्या मर्यादित आहे. उलट ट्रॅकशेजारी राहणारी मंडळी थर्ड आय बणून अपघात रोखण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळे यापुढे रेल्वेचे तसेच सुरक्षा दलाचे कर्मचारी, जवान नियमित नागरिकांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन त्यांना समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि रेल्वे अपघात रोखण्यासाठी अलर्ट करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. गाव-शहरातील नागरिकच नव्हे तर जंगलात गुरे चाणरांची, राखण करणारांनाही अलर्ट मोडवर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.

तात्काळ अॅक्शन मोड'च्या सूचनारेल्वे लाईनच्या आजुबाजुला कुठे, कोणताही संशयीत आढळल्यास तात्काळ अॅक्शन मोडवर या. जवळच्या रेल्वे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान, रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्यापैकी कुणालाही तात्काळ सूचना द्या. देशाचे सजग प्रहरी म्हणून अभिमानाची कामगिरी बजावा, असे नागरिकांना सांगण्यात येत आहे.

जनजागरणाची विशेष मोहिमरेल्वेचा एक अपघात घडला तर शेकडो प्रवाशांच्या जान-मालाला नुकसान पोहचवू शकतो. त्यामुळे समाजकंटकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आणि रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी लोकसहभागच अत्यंत प्रभावी उपाय ठरणार असल्याचे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागरण करून नागरिकांची मदत घेतली जात असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य यांनी लोकमतशी बोलताना म्हटले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे