शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत २५ हजारावर इन्सुलिन इंजेक्शनचा रोज कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:28 IST

नागपुरात मधुमेहाचे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देजबाबदारी कोण घेणार?हेपेटायटिस, एचआयव्हीपेक्षाही गंभीर आजाराचा धोका

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत मधुमेहाची उपराजधानी ठरत आहे. एकट्या भारतात ७० लाख तर नागपुरात तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत. त्यातही ‘टाईप-१’ या वर्गातील म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांना भेडसावणाऱ्या व फक्त इंजेक्शन इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहींची संख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे. नागपुरात असे सुमारे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण दिवसातून एक ते चारवेळा इन्सुलिन घेतात. यातील मोजकेच रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते. या जैविक कचऱ्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बदलत्या जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत साधारण १० टक्के म्हणजे तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत.घराघरातून निघणाऱ्या ‘बायोमेडिकल वेस्ट’कडे दुर्लक्ष‘बायोमेडिकल वेस्ट’ म्हणजे जैविक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, उपचार व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन मानव व पर्यावरणासाठी निकोप होण्याच्या दृष्टीने कठोर नियम आहेत. बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. परंतु अनेक घरांमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात आलेले कॉटन, बँडेज, औषधे, इंजेक्शन व सिरिंज थेट सामान्य कचऱ्यात फेकतात. यात कचऱ्यात आढळून येणाऱ्या इन्सुलिनची संख्या मोठी आहे. मनपाने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गंभीर आजाराचा धोका - गिल्लूरकरमधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, कचऱ्यात विविध प्रकारचे जीवाणू-विषाणू असतात. यात वापरलेल्या सिरिंज पडून राहिल्यास आणखी गंभीर आजाराचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, कचरा उचलणारे सुई टोचल्यावर डॉक्टरांकडे फार कमी जातात. दुसरीकडे घराघरातील कचरा वसाहतीत जमा करून नंतर तो डम्पिंग यार्डकडे जातो. अशा कचऱ्यावर मोकाट जनावरे चरतात. यामुळे या छोट्याशा जखमेचा भविष्यात मोठा घातक परिणाम होऊ शकतो. शिवाय, ‘हिपेटायटिस’ किंवा ‘एचआयव्ही’ किंवा इतर गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो. यामुळे रुग्णांमध्ये याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांची गरज - गुप्तामधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, शहरात इन्सुलिन घेणाऱ्या ‘टाईप-१’ मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील काही रुग्णांना दिवसातून एकवेळा तर काहींना दोन ते चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. प्रत्येक वेळी नव्या सिरिंजचा वापर करण्याचा नियम आहे. परंतु यावरील खर्च सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. यामुळे काही रुग्ण एका सिरिंजचा दोनपेक्षा जास्तवेळा वापर करतात. याबाबत व वापरलेल्या इंजेक्शनच्या विल्हेवाटीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व तयार होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्य