शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत २५ हजारावर इन्सुलिन इंजेक्शनचा रोज कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:28 IST

नागपुरात मधुमेहाचे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देजबाबदारी कोण घेणार?हेपेटायटिस, एचआयव्हीपेक्षाही गंभीर आजाराचा धोका

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत मधुमेहाची उपराजधानी ठरत आहे. एकट्या भारतात ७० लाख तर नागपुरात तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत. त्यातही ‘टाईप-१’ या वर्गातील म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांना भेडसावणाऱ्या व फक्त इंजेक्शन इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहींची संख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे. नागपुरात असे सुमारे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण दिवसातून एक ते चारवेळा इन्सुलिन घेतात. यातील मोजकेच रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते. या जैविक कचऱ्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बदलत्या जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत साधारण १० टक्के म्हणजे तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत.घराघरातून निघणाऱ्या ‘बायोमेडिकल वेस्ट’कडे दुर्लक्ष‘बायोमेडिकल वेस्ट’ म्हणजे जैविक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, उपचार व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन मानव व पर्यावरणासाठी निकोप होण्याच्या दृष्टीने कठोर नियम आहेत. बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. परंतु अनेक घरांमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात आलेले कॉटन, बँडेज, औषधे, इंजेक्शन व सिरिंज थेट सामान्य कचऱ्यात फेकतात. यात कचऱ्यात आढळून येणाऱ्या इन्सुलिनची संख्या मोठी आहे. मनपाने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गंभीर आजाराचा धोका - गिल्लूरकरमधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, कचऱ्यात विविध प्रकारचे जीवाणू-विषाणू असतात. यात वापरलेल्या सिरिंज पडून राहिल्यास आणखी गंभीर आजाराचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, कचरा उचलणारे सुई टोचल्यावर डॉक्टरांकडे फार कमी जातात. दुसरीकडे घराघरातील कचरा वसाहतीत जमा करून नंतर तो डम्पिंग यार्डकडे जातो. अशा कचऱ्यावर मोकाट जनावरे चरतात. यामुळे या छोट्याशा जखमेचा भविष्यात मोठा घातक परिणाम होऊ शकतो. शिवाय, ‘हिपेटायटिस’ किंवा ‘एचआयव्ही’ किंवा इतर गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो. यामुळे रुग्णांमध्ये याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांची गरज - गुप्तामधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, शहरात इन्सुलिन घेणाऱ्या ‘टाईप-१’ मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील काही रुग्णांना दिवसातून एकवेळा तर काहींना दोन ते चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. प्रत्येक वेळी नव्या सिरिंजचा वापर करण्याचा नियम आहे. परंतु यावरील खर्च सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. यामुळे काही रुग्ण एका सिरिंजचा दोनपेक्षा जास्तवेळा वापर करतात. याबाबत व वापरलेल्या इंजेक्शनच्या विल्हेवाटीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व तयार होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्य