शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

उपराजधानीत २५ हजारावर इन्सुलिन इंजेक्शनचा रोज कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:28 IST

नागपुरात मधुमेहाचे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देजबाबदारी कोण घेणार?हेपेटायटिस, एचआयव्हीपेक्षाही गंभीर आजाराचा धोका

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत मधुमेहाची उपराजधानी ठरत आहे. एकट्या भारतात ७० लाख तर नागपुरात तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत. त्यातही ‘टाईप-१’ या वर्गातील म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांना भेडसावणाऱ्या व फक्त इंजेक्शन इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहींची संख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे. नागपुरात असे सुमारे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण दिवसातून एक ते चारवेळा इन्सुलिन घेतात. यातील मोजकेच रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते. या जैविक कचऱ्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बदलत्या जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत साधारण १० टक्के म्हणजे तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत.घराघरातून निघणाऱ्या ‘बायोमेडिकल वेस्ट’कडे दुर्लक्ष‘बायोमेडिकल वेस्ट’ म्हणजे जैविक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, उपचार व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन मानव व पर्यावरणासाठी निकोप होण्याच्या दृष्टीने कठोर नियम आहेत. बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. परंतु अनेक घरांमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात आलेले कॉटन, बँडेज, औषधे, इंजेक्शन व सिरिंज थेट सामान्य कचऱ्यात फेकतात. यात कचऱ्यात आढळून येणाऱ्या इन्सुलिनची संख्या मोठी आहे. मनपाने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गंभीर आजाराचा धोका - गिल्लूरकरमधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, कचऱ्यात विविध प्रकारचे जीवाणू-विषाणू असतात. यात वापरलेल्या सिरिंज पडून राहिल्यास आणखी गंभीर आजाराचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, कचरा उचलणारे सुई टोचल्यावर डॉक्टरांकडे फार कमी जातात. दुसरीकडे घराघरातील कचरा वसाहतीत जमा करून नंतर तो डम्पिंग यार्डकडे जातो. अशा कचऱ्यावर मोकाट जनावरे चरतात. यामुळे या छोट्याशा जखमेचा भविष्यात मोठा घातक परिणाम होऊ शकतो. शिवाय, ‘हिपेटायटिस’ किंवा ‘एचआयव्ही’ किंवा इतर गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो. यामुळे रुग्णांमध्ये याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांची गरज - गुप्तामधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, शहरात इन्सुलिन घेणाऱ्या ‘टाईप-१’ मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील काही रुग्णांना दिवसातून एकवेळा तर काहींना दोन ते चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. प्रत्येक वेळी नव्या सिरिंजचा वापर करण्याचा नियम आहे. परंतु यावरील खर्च सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. यामुळे काही रुग्ण एका सिरिंजचा दोनपेक्षा जास्तवेळा वापर करतात. याबाबत व वापरलेल्या इंजेक्शनच्या विल्हेवाटीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व तयार होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्य