शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्लास्टिकबंदीमुळे हजारो उद्योग बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:53 IST

राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीमुळे या व्यवसायाशी संबंधित राज्यातील हजारो उद्योग बंद होणार आहेत. निर्णय घेताना सरकारने प्लास्टिक उद्योजकांशी चर्चा केलेली नाही, शिवाय अधिसूचनेत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे १० हजार कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊन थेट ५ लाख लोकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. बंदीमुळे राज्यातील अनेक आॅर्डर अन्य राज्यात स्थलांतरित होणार आहे. सरकारने बंदीचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत विविध औद्योगिक संघटनांनी केली.

ठळक मुद्दे राज्याने बंदीचा निर्णय मागे घ्यावा : विविध औद्योगिक संघटनांची मागणी, १० हजार कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीमुळे या व्यवसायाशी संबंधित राज्यातील हजारो उद्योग बंद होणार आहेत. निर्णय घेताना सरकारने प्लास्टिक उद्योजकांशी चर्चा केलेली नाही, शिवाय अधिसूचनेत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे १० हजार कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊन थेट ५ लाख लोकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. बंदीमुळे राज्यातील अनेक आॅर्डर अन्य राज्यात स्थलांतरित होणार आहे. सरकारने बंदीचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत विविध औद्योगिक संघटनांनी केली.यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, विदर्भ प्लास्टिक असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (बीएमए), एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (एमआयए), विदर्भ डिस्पोजल अ‍ॅण्ड ट्रेड असोसिएशन, लघु उद्योग भारती, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असोसिएशन, नागपूर होटल ओनर्स असोसिएशन, होलसेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे म्हणाले, सरकारने एकतर्फी निर्णय घेऊन सर्व उद्योगांना संकटात टाकले असून, त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार हिरावणार आहे. प्रवीण तापडिया म्हणाले, अधिसूचनेत स्पष्टता नाही. सरकारने थेट उद्योगांना टारगेट केले आहे. प्लास्टिकसंदर्भात लोकांना जागरूक करण्याची गरज आहे. पण सरकार थेट उद्योगांवर प्रहार करीत आहे. जगात कुठेही प्लास्टिकवर बंदी नाही, पण राज्यात सरकारने बंदी केली आहे. उद्योजक व व्यावसायिक तीव्र आंदोलन करेल. व्हीपीआयएचे अध्यक्ष विशाल अग्रवाल म्हणाले, आपल्या देशात उलटे होत आहे. चीन कागदावर बंदी आणून प्लास्टिकला प्रोत्साहन देत आहे. कागदाला प्रोत्साहन देऊन पर्यावरणाला नुकसान होणार आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे कोट्यवधींचा लाखोंचा व्यवसाय डबघाईस आला आहे. एमआयएचे अध्यक्ष सी.एम. रणधीर म्हणाले, हिंगण्यात प्लास्टिक उद्योग जास्त आहेत. बंदीचा निर्णय मान्य नसून ५० हजार कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी म्हणाले, सरकारचा आदेश व्यापारी मान्य करणार नाही. गरज भासल्यास सरकारच्या आदेशाविराधोत तीव्र आंदोलन उभारू. बीएमएचे सचिव मिलिंद कानडे म्हणाले, प्लास्टिकवर बंदी टाकून सरकार आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकत आहे. बीएमए प्लास्टिक उद्योजकांसोबत आहे.याप्रसंगी गिरधारी मंत्री, हरीश मंत्री, सुभाष बुधे, मनीष जैन, अजय अग्रवाल, पंकज बक्षी, सुनील काबरा, राजेश बटवानी, विदांत भरतीया, निशांत बिडला, सुरेश राठी, रिता लांजेवार उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीagitationआंदोलन