शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

प्लास्टिकबंदीमुळे हजारो उद्योग बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:53 IST

राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीमुळे या व्यवसायाशी संबंधित राज्यातील हजारो उद्योग बंद होणार आहेत. निर्णय घेताना सरकारने प्लास्टिक उद्योजकांशी चर्चा केलेली नाही, शिवाय अधिसूचनेत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे १० हजार कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊन थेट ५ लाख लोकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. बंदीमुळे राज्यातील अनेक आॅर्डर अन्य राज्यात स्थलांतरित होणार आहे. सरकारने बंदीचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत विविध औद्योगिक संघटनांनी केली.

ठळक मुद्दे राज्याने बंदीचा निर्णय मागे घ्यावा : विविध औद्योगिक संघटनांची मागणी, १० हजार कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीमुळे या व्यवसायाशी संबंधित राज्यातील हजारो उद्योग बंद होणार आहेत. निर्णय घेताना सरकारने प्लास्टिक उद्योजकांशी चर्चा केलेली नाही, शिवाय अधिसूचनेत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे १० हजार कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊन थेट ५ लाख लोकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. बंदीमुळे राज्यातील अनेक आॅर्डर अन्य राज्यात स्थलांतरित होणार आहे. सरकारने बंदीचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत विविध औद्योगिक संघटनांनी केली.यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, विदर्भ प्लास्टिक असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (बीएमए), एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (एमआयए), विदर्भ डिस्पोजल अ‍ॅण्ड ट्रेड असोसिएशन, लघु उद्योग भारती, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असोसिएशन, नागपूर होटल ओनर्स असोसिएशन, होलसेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे म्हणाले, सरकारने एकतर्फी निर्णय घेऊन सर्व उद्योगांना संकटात टाकले असून, त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार हिरावणार आहे. प्रवीण तापडिया म्हणाले, अधिसूचनेत स्पष्टता नाही. सरकारने थेट उद्योगांना टारगेट केले आहे. प्लास्टिकसंदर्भात लोकांना जागरूक करण्याची गरज आहे. पण सरकार थेट उद्योगांवर प्रहार करीत आहे. जगात कुठेही प्लास्टिकवर बंदी नाही, पण राज्यात सरकारने बंदी केली आहे. उद्योजक व व्यावसायिक तीव्र आंदोलन करेल. व्हीपीआयएचे अध्यक्ष विशाल अग्रवाल म्हणाले, आपल्या देशात उलटे होत आहे. चीन कागदावर बंदी आणून प्लास्टिकला प्रोत्साहन देत आहे. कागदाला प्रोत्साहन देऊन पर्यावरणाला नुकसान होणार आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे कोट्यवधींचा लाखोंचा व्यवसाय डबघाईस आला आहे. एमआयएचे अध्यक्ष सी.एम. रणधीर म्हणाले, हिंगण्यात प्लास्टिक उद्योग जास्त आहेत. बंदीचा निर्णय मान्य नसून ५० हजार कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी म्हणाले, सरकारचा आदेश व्यापारी मान्य करणार नाही. गरज भासल्यास सरकारच्या आदेशाविराधोत तीव्र आंदोलन उभारू. बीएमएचे सचिव मिलिंद कानडे म्हणाले, प्लास्टिकवर बंदी टाकून सरकार आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकत आहे. बीएमए प्लास्टिक उद्योजकांसोबत आहे.याप्रसंगी गिरधारी मंत्री, हरीश मंत्री, सुभाष बुधे, मनीष जैन, अजय अग्रवाल, पंकज बक्षी, सुनील काबरा, राजेश बटवानी, विदांत भरतीया, निशांत बिडला, सुरेश राठी, रिता लांजेवार उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीagitationआंदोलन