शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

वेडिंग इंडस्ट्रीचे हजारो कोटी कोरोनात स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 22:23 IST

Corona, wedding industry वाढत्या शहरीकरणाच्या धामधुमीत विवाह, मुंज, वाढदिवसापासून ते चौदावीच्या कार्यक्रमांसाठी सर्वसुविधांनी युक्ती सेलिब्रेशन हॉल्स, लॉन्सची रचना झाली आणि म्हणता म्हणता हा एक मोठा उद्योग झाला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वावटळीत हा उद्योग पार बुडाला आणि या उद्योगावर निर्भर लहानमोठे व्यापारही धुळीस मिळाले आहेत.

ठळक मुद्दे टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाचा केला जातोय निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या शहरीकरणाच्या धामधुमीत विवाह, मुंज, वाढदिवसापासून ते चौदावीच्या कार्यक्रमांसाठी सर्वसुविधांनी युक्ती सेलिब्रेशन हॉल्स, लॉन्सची रचना झाली आणि म्हणता म्हणता हा एक मोठा उद्योग झाला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वावटळीत हा उद्योग पार बुडाला आणि या उद्योगावर निर्भर लहानमोठे व्यापारही धुळीस मिळाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आणि अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पुन्हा एकदा वाढत्या प्रकोपात आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या धास्तीने भेडसावलेले हे उद्योजक थेट शासनाच्या विरोधात उभे झाले आहेत.

भटकंती करत असताना शहरात जेवढे सेलिब्रेशन्स हॉल, लॉन्स आढळतील त्या सर्वांच्या द्वारावर शासनाच्या निषेधाचे फलक लागलेले आढळतील. वेडिंग इंडस्ट्री बचाव, असा या फलकांचा सूर आहे. शहरात साधारणत: २५०-३०० हॉल्स-लॉन्स आहेत. या प्रत्येक हॉल्स-लॉन्समध्ये कोणतेही सोहळे आयोजित करण्यासाठी सर्व सुविधांच्या मोबदल्यात लाखो रुपये घेतले जातात. एकाच छताखाली सर्व सुविधा प्राप्त होत असल्याने आयोजकांकडून हे पैसे सहजतेने दिले जातात. या हॉल्स-लॉन्समध्ये आयोजित होणाऱ्या सोहळ्यांवर टेण्ट, डेकोरेशन, बॅण्ड, संगीत, गायक आदी कलाकार, भांडी विक्रेते, गिफ्ट विक्रेते, फुलविक्रेते यांचा व्यवसाय चालत असतो. सोबतीला शेकडो रोजगार. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा सगळा उद्योग-व्यापार मोडकळीस आला आहे. टाळेबंदी आणि सोहळ्यांमध्ये येणाऱ्या आमंत्रितांच्या संख्येची मर्यादा, यामुळे अनेक आयोजक आपले सोहळे रद्द करत आहेत आणि पैसा परत मागत आहेत. अशा तऱ्हेने गेल्या वर्षभरात हजारो कोटींचा हा उद्योग रसातळाला गेला आहे. हॉल्स-लॉन्सवाल्यांना कर्मचाऱ्यांना पगार देणे होत नाहीये. वीज-पाणी बिल वाढतच आहे. अशा स्थितीत सगळेच हतबल झाल्याची स्थिती आहे.

आतापर्यंत ५० लाख रुपये केले परत

टाळेबंदीत अनेकांनी सोहळे रद्द केले. काहींनी तशाच छोटेखानी सोहळे पार पाडले. मात्र, सगळ्यांनाच कमी-जास्त प्रमाणात तर काहींना पूर्णच पैसे परत करावे लागले आहे. शिवाय, नियोजित बुकिंग आल्या नाहीत. गेल्या वर्षभरात साधारणत: ५० लाख रुपयांची बुकिंग परत करावी लागली आहे. कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यावा, व्यवस्थेचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न आहे. त्यातच पुन्हा टाळेबंदीची धास्ती आहेच. स्थिती फार भयंकर झाली आहे.

रवींद्र सुरकर, व्यवस्थापक, जैन कलार समाजभवन, रेशीमबाग

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या