शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

दीक्षाभूमीवरून हजारो बौद्ध बांधवांना हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:04 IST

सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपोलीस व स्मारक समितीवर संताप : नागरिकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. समता सैनिक दलाने पत्रपरिषद घेऊन या घटनेचा निषेध नोंदवत पोलीस व स्मारक समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण म्हणून नागपूरकर व परिसरातील हजारो बौद्ध बांधव या दिवशी दीक्षभूमीवर कुटुंबासह येतात. परंतु मागील काही वर्षांपासून रात्रीच्या वेळी त्यांना हाकलून लावण्याचे प्रकार वाढले आहे. सोमवारी सुद्धा असाच प्रकार घडला. रात्री मोठ्या संख्येने नागरिक दीक्षाभूमीवर जमले होते. परंतु १० वाजेपासून त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला परिसरातील दिवे बंद करण्यात आले. अनेक लोक कुटुंबासह जेवण करीत होते. त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावरून काही लोकानी पोलिसांशी वाद घातला. तेव्हा आम्हाला समितीकडून तशा सूचना असल्याचे सांगण्यात आले. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे.दीक्षभूमीचे गेट हे रात्री ८ वाजता बंद होते. परंतु १४ तारीख ही विशेष आहे. या दिवशी हजारो लोक राहतात. काही दूरवरूनही येतात. अशा वेळी त्यांना वेळ झाला म्हणून रात्रीच्या वेळी बाहेर काढणे योग्य नाही. या दिवशी दीक्षाभूमीत लोकांना रात्री उशिरापर्यंत राहू देण्यात यावे, अशी मागणी लोकांची आहे परंतु त्याकडे स्मारक समिती लक्ष देत नाही, याचा आम्ही निषेध हा प्रकार तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारीपुत्त व प्रवक्ते प्रकाश दार्शनिक यांनी केली. यावेळी कांचन वासनिक, दिपांकर सहारे, सुदर्शन गेडाम, गोपाल बागडे, डॉ. अनिल दवडे, अश्विनी खोब्रागडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीPoliceपोलिस