शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

धर्म वाचविण्यासाठी बलिदान देणारे आदर्शच : सरसंघचालक मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: August 6, 2025 18:55 IST

Nagpur : धर्मजागरण न्यासाच्या कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांच्या जीवनात कठीण प्रसंग येतात व त्यांचे धैर्य तुटते. त्यातून ते सन्मार्ग सोडतात. पण, पुरुषार्थी लोक न थकता व न थांबता पूर्ण शक्ती लावून धर्माप्रति पक्के राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संकटे आली, पण त्यांनी शक्ती व युक्तीने मार्ग काढलाच. मनुष्याच्या मनात धर्माची निष्ठा पक्की हवी. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिले आहेत. त्यांच्यावर अत्याचार झाले, पण त्यांनी धर्म नाही सोडला. असेच लोक आपल्यासमोरील आदर्श असले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील भगवाननगरात धर्मजागरण न्यासाच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

धनश्री सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, धर्मजागरण न्यासचे अखिल भारतीय पदाधिकारी शरद ढोले, न्यासचे अध्यक्ष विजय कैथे प्रामुख्याने उपस्थित होते.

जगातील लोक म्हणतात की, आपण वेगवेगळे आहोत व म्हणून एक व्हावे लागेल. मात्र, आपला धर्म विविधतांचा स्वीकार करण्याची शिकवण देतो. हिंदूधर्म मानवधर्माचे आचरणच शिकवतो. सर्वांचा मार्ग वेगवेगळा असला तरी गंतव्य एकाच जागी असते. त्यामुळे इतरांचा रस्ता बदलण्याचा प्रयत्न करायला नको. तुमचा मार्ग कुठला आहे, यावर संघर्ष व्हायला नको. धर्मजागरण होईल तेव्हाच हिंदू धर्माच्या आचरणाचा समूह अस्तित्वात राहील. धर्म ग्रंथापुरता मर्यादित राहणार नाही. जगाला दिशा दाखविण्यासाठी जगासमोर तसे मॉडेल तयार करणे ही भारताचीच जबाबदारी आहे, असे सरसंघचालक म्हणाले. सुनील भूगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

धर्म ठीक असला तर समाजात संतुलन-शांती शक्य

धर्म म्हणजे कर्तव्य हा आपला विचार आहे. त्यातूनच राजधर्म, प्रजाधर्म, पितृधर्म या गोष्टी समोर आल्या. सनातन धर्म हा आत्मीयता व विविधतेचा पूर्ण स्वीकार करणे शिकवतो. भारतात विविधता असली तरी शेवटी सर्व लोक एकच आहेत. सर्व विविधतांचा स्वीकार करणे हाच खरा धर्म आहे. लोकांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्याचे गंतव्य एकच असते. धर्माचे कार्य हे केवळ ईश्वरासाठी नसते तर ते समाजासाठीदेखील असते. त्यामुळेच धर्म ठीक असला तर समाजात संतुलन व शांती नांदू शकते असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ