शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

धर्म वाचविण्यासाठी बलिदान देणारे आदर्शच : सरसंघचालक मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: August 6, 2025 18:55 IST

Nagpur : धर्मजागरण न्यासाच्या कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांच्या जीवनात कठीण प्रसंग येतात व त्यांचे धैर्य तुटते. त्यातून ते सन्मार्ग सोडतात. पण, पुरुषार्थी लोक न थकता व न थांबता पूर्ण शक्ती लावून धर्माप्रति पक्के राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संकटे आली, पण त्यांनी शक्ती व युक्तीने मार्ग काढलाच. मनुष्याच्या मनात धर्माची निष्ठा पक्की हवी. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिले आहेत. त्यांच्यावर अत्याचार झाले, पण त्यांनी धर्म नाही सोडला. असेच लोक आपल्यासमोरील आदर्श असले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील भगवाननगरात धर्मजागरण न्यासाच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

धनश्री सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, धर्मजागरण न्यासचे अखिल भारतीय पदाधिकारी शरद ढोले, न्यासचे अध्यक्ष विजय कैथे प्रामुख्याने उपस्थित होते.

जगातील लोक म्हणतात की, आपण वेगवेगळे आहोत व म्हणून एक व्हावे लागेल. मात्र, आपला धर्म विविधतांचा स्वीकार करण्याची शिकवण देतो. हिंदूधर्म मानवधर्माचे आचरणच शिकवतो. सर्वांचा मार्ग वेगवेगळा असला तरी गंतव्य एकाच जागी असते. त्यामुळे इतरांचा रस्ता बदलण्याचा प्रयत्न करायला नको. तुमचा मार्ग कुठला आहे, यावर संघर्ष व्हायला नको. धर्मजागरण होईल तेव्हाच हिंदू धर्माच्या आचरणाचा समूह अस्तित्वात राहील. धर्म ग्रंथापुरता मर्यादित राहणार नाही. जगाला दिशा दाखविण्यासाठी जगासमोर तसे मॉडेल तयार करणे ही भारताचीच जबाबदारी आहे, असे सरसंघचालक म्हणाले. सुनील भूगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

धर्म ठीक असला तर समाजात संतुलन-शांती शक्य

धर्म म्हणजे कर्तव्य हा आपला विचार आहे. त्यातूनच राजधर्म, प्रजाधर्म, पितृधर्म या गोष्टी समोर आल्या. सनातन धर्म हा आत्मीयता व विविधतेचा पूर्ण स्वीकार करणे शिकवतो. भारतात विविधता असली तरी शेवटी सर्व लोक एकच आहेत. सर्व विविधतांचा स्वीकार करणे हाच खरा धर्म आहे. लोकांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्याचे गंतव्य एकच असते. धर्माचे कार्य हे केवळ ईश्वरासाठी नसते तर ते समाजासाठीदेखील असते. त्यामुळेच धर्म ठीक असला तर समाजात संतुलन व शांती नांदू शकते असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ