शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुण्याहून आलेल्यांनी वाढविली नागपूर जिल्ह्याची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:46 IST

शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव केला आहे. तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या नागपूर जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देवाढतेय संक्रमितांची संख्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव केला आहे. तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या नागपूर जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.चौथ्या लॉकडाऊननंतर शासनाने दिलेली शिथिलता व यानंतर इतर जिल्ह्यात राज्यात अडकलेल्या नागरिकांचा जिल्ह्यातील प्रवेश यामुळे ग्रामीण भागामध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर जिल्ह्याच्या बाहेर अडकन पडलेले नागपूर जिल्ह्यातील गावात पोहोचत आहेत. तसे प्रशासनाने या नागरिकांना गावातील शाळेत, समाजभवनात क्वारंटाईन केले आहे. परंतु क्वारंटाईनच्या भीतीमुळे काही महाभाग प्रशासनाला न सांगताच पळ काढत आहेत. एप्रिल महिन्यात कामठी आणि कन्हान या भागातच कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. मात्र हे दोन्ही रुग्ण उपचारानंतर बरे झाले. परंतु शासनाने बाहेरील राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी परत येण्याची मुभा दिल्यामुळे रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. जिल्ह्यातील कामठी, कन्हान, खरबी, बुटीबोरी, दुधाळा (कोंढाळी), दहेगाव रंगारी (सावनेर), सोनोली (कळमेश्वर), मन्नाथखेडी (नरखेड), गुमगाव (हिंगणा), कोराडी येथेही आता कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाची दहशत पसरत आहे. अशात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे.शासकीय कार्यालयात भीतीचे वातावरणग्रामीण भागातून मोठ्या संख्येने जनता जिल्हा परिषदेत येते. सध्या जिल्हा परिषदेत बहुतांश योजनांची अंमलबजावणी थांबवली आहे. परंतु दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी दलित वस्तीचे प्रस्ताव, त्या संदर्भातील चौकशीसाठी नागरिक जिल्हा परिषदेत येत आहेत. लोकप्रतिनिधीसुद्धा दलित वस्तीच्या कामांसाठी गर्दी करीत आहेत. मात्र ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेत सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. परंतु ग्रामीण भागातून होत असलेली गर्दी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची भावना कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईPuneपुणे