शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

By निशांत वानखेडे | Updated: March 5, 2025 18:37 IST

मार्च महिन्यातही उष्ण लाटेचा इशारा : हवामान खात्याचा इशारा

नागपूर : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात तापमानाने उसळी घेतली आहे. त्यामुळे हवामान खात्याचेही कान टवकारले आहेत. बदलत्या वातावरणानुसार यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याचा व मार्च ते मे या काळात नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

दरवर्षी साधारणत: हाेळीपर्यंत थंडीची जाणीव हाेत राहते व तापमान नियंत्रणात असते. यावर्षी मात्र फेब्रुवारीपासून सूर्य तापायला लागला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पारा सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने अधिक म्हणजे ३२ ते ३५ अंशापर्यंत कायम राहिला. मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाने ३५ अंशाच्या वर घाेडदाैड सुरू केली आहे. मंगळवारी म्हणजे ४ मार्च राेजी राज्यातील बहुतेक शहरे चांगलीच तापलेली हाेती. मध्य महाराष्ट्रातील साेलापूर शहर ३९.४ अंशासह सर्वाधिक तापलेले हाेते. त्याखालाेखाल चंद्रपूर ३९ अंशावर, तर नागपूरचा पारा ३७.६ अंश नाेंदविण्यात आला. तापमानवाढीचे हे सत्र पुढेही कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वेधशाळेने केले आहे.

वेधशाळेचा हा आहे इशारा

  • वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत उत्तर व मध्य भारतासह बहुतेक भागात तापमान सरासरीपेक्षा ५ किंवा त्यापेक्षा अधिक अंशाने वर राहण्याची शक्यता आहे.
  • उष्ण लाटांचे दिवस नेहमीपेक्षा अधिक राहतील.
  • उत्तर व मध्य भारताला मार्चमध्येच उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

 

काय आहे कारण?

वेधशाळेने तापमान वाढीसाठी काेणत्याही कारणाचे स्पष्टीकरण दिले नाही. मात्र यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तापणार, हा अंदाज मात्र व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते एप्रिलमध्ये लाॅ-निनाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान वाढ हाेईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलTemperatureतापमानnagpurनागपूर