शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

By निशांत वानखेडे | Updated: March 5, 2025 18:37 IST

मार्च महिन्यातही उष्ण लाटेचा इशारा : हवामान खात्याचा इशारा

नागपूर : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात तापमानाने उसळी घेतली आहे. त्यामुळे हवामान खात्याचेही कान टवकारले आहेत. बदलत्या वातावरणानुसार यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याचा व मार्च ते मे या काळात नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

दरवर्षी साधारणत: हाेळीपर्यंत थंडीची जाणीव हाेत राहते व तापमान नियंत्रणात असते. यावर्षी मात्र फेब्रुवारीपासून सूर्य तापायला लागला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पारा सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने अधिक म्हणजे ३२ ते ३५ अंशापर्यंत कायम राहिला. मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाने ३५ अंशाच्या वर घाेडदाैड सुरू केली आहे. मंगळवारी म्हणजे ४ मार्च राेजी राज्यातील बहुतेक शहरे चांगलीच तापलेली हाेती. मध्य महाराष्ट्रातील साेलापूर शहर ३९.४ अंशासह सर्वाधिक तापलेले हाेते. त्याखालाेखाल चंद्रपूर ३९ अंशावर, तर नागपूरचा पारा ३७.६ अंश नाेंदविण्यात आला. तापमानवाढीचे हे सत्र पुढेही कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वेधशाळेने केले आहे.

वेधशाळेचा हा आहे इशारा

  • वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत उत्तर व मध्य भारतासह बहुतेक भागात तापमान सरासरीपेक्षा ५ किंवा त्यापेक्षा अधिक अंशाने वर राहण्याची शक्यता आहे.
  • उष्ण लाटांचे दिवस नेहमीपेक्षा अधिक राहतील.
  • उत्तर व मध्य भारताला मार्चमध्येच उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

 

काय आहे कारण?

वेधशाळेने तापमान वाढीसाठी काेणत्याही कारणाचे स्पष्टीकरण दिले नाही. मात्र यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तापणार, हा अंदाज मात्र व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते एप्रिलमध्ये लाॅ-निनाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान वाढ हाेईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलTemperatureतापमानnagpurनागपूर