शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

By निशांत वानखेडे | Updated: March 5, 2025 18:37 IST

मार्च महिन्यातही उष्ण लाटेचा इशारा : हवामान खात्याचा इशारा

नागपूर : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात तापमानाने उसळी घेतली आहे. त्यामुळे हवामान खात्याचेही कान टवकारले आहेत. बदलत्या वातावरणानुसार यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याचा व मार्च ते मे या काळात नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

दरवर्षी साधारणत: हाेळीपर्यंत थंडीची जाणीव हाेत राहते व तापमान नियंत्रणात असते. यावर्षी मात्र फेब्रुवारीपासून सूर्य तापायला लागला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पारा सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने अधिक म्हणजे ३२ ते ३५ अंशापर्यंत कायम राहिला. मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाने ३५ अंशाच्या वर घाेडदाैड सुरू केली आहे. मंगळवारी म्हणजे ४ मार्च राेजी राज्यातील बहुतेक शहरे चांगलीच तापलेली हाेती. मध्य महाराष्ट्रातील साेलापूर शहर ३९.४ अंशासह सर्वाधिक तापलेले हाेते. त्याखालाेखाल चंद्रपूर ३९ अंशावर, तर नागपूरचा पारा ३७.६ अंश नाेंदविण्यात आला. तापमानवाढीचे हे सत्र पुढेही कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वेधशाळेने केले आहे.

वेधशाळेचा हा आहे इशारा

  • वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत उत्तर व मध्य भारतासह बहुतेक भागात तापमान सरासरीपेक्षा ५ किंवा त्यापेक्षा अधिक अंशाने वर राहण्याची शक्यता आहे.
  • उष्ण लाटांचे दिवस नेहमीपेक्षा अधिक राहतील.
  • उत्तर व मध्य भारताला मार्चमध्येच उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

 

काय आहे कारण?

वेधशाळेने तापमान वाढीसाठी काेणत्याही कारणाचे स्पष्टीकरण दिले नाही. मात्र यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तापणार, हा अंदाज मात्र व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते एप्रिलमध्ये लाॅ-निनाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान वाढ हाेईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलTemperatureतापमानnagpurनागपूर